अमरावती, प्रतिनिधी: जिल्ह्यात येत्या तीन दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या तापमानात वाढ होणार असून नागरिकांनी याबाबत सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
भारतीय हवामान खात्याने विदर्भात येत्या तीन दिवस उष्णतेच्या लाटेबाबत इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी उन्हात जाणे टाळावे, तसेच आवश्यक असल्यास उष्णतेपासून बचाव करण्याचा उपायाचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
उष्णतेच्या लाटेबाबत इशारा / Heat Wave Advisoryभारत हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेची (Heat Wave) चेतावणी जारी केली आहे. तसेच विदर्भातील इतर भागांमध्येही कमाल तापमान सामान्यापेक्षा सुमारे ३–४°से. अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.उष्णतेच्या लाटेदरम्यान घ्यावयाची काळजी (IMD मार्गदर्शक तत्त्वे):* शक्यतो दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर जाणे टाळावे.* पुरेसे पाणी प्या, तहान नसली तरी नियमितपणे द्रवपदार्थ घ्यावेत.* हलके, सैल आणि फिकट रंगाचे सूती कपडे परिधान करावेत.* बाहेर पडताना टोपी, छत्री किंवा ओला कापड वापरून डोके झाकावे.* मद्यपान, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड पेये कमी प्रमाणात घ्यावीत, कारण त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता वाढू शकते.* लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.* जनावरांना सावलीत ठेवावे व त्यांना पुरेसे स्वच्छ पाणी द्यावे.* उष्माघाताची लक्षणे (डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ, जास्त घाम येणे) जाणवली तर त्वरित सावलीत विश्रांती घ्यावी व आवश्यक असल्यास वैद्यकीय मदत घ्यावी.नागरिकांनी सतर्क राहून हवामान विभागाच्या पुढील सूचना व अद्ययावत माहितीकडे लक्ष द्यावे.भारत हवामान विभागप्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर