vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महिलांच्या हक्काचा विरोध करणाऱ्यांना जनता माफ करत नाही!” – पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लोकसभेत स्पष्टोक्ती 

महिलांच्या हक्काचा विरोध करणाऱ्यांना जनता माफ करत नाही!” – पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लोकसभेत स्पष्टोक्ती

नवी दिल्ली प्रतिनिधी- आज लोकसभेत पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत भाष्य करताना विरोधकांना खडेबोल सुनावले. म्हणाले की  महिलांच्या हक्काचा विरोध करणाऱ्यांना जनता माफ करत नाही!” – पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लोकसभेत स्पष्टोक्ती

♦️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत भाष्य करताना विरोधकांना खडेबोल सुनावले.आपल्या देशात जेव्हा जेव्हा महिला आरक्षणावर चर्चा झाली आणि त्यानंतर निवडणुका आल्या, तेव्हा ज्यांनी महिलांच्या या हक्काला विरोध केला, त्यांना महिलांनी कधीच माफ केले नाही.

♦️२०२४ च्या निवडणुकीत हा मुद्दा राहिला नाही, कारण संसदेत सर्वांनी एकमताने महिला आरक्षण विधेयक मंजूर केले होते.आरक्षणाची अंमलबजावणी आणि त्यासोबतची पुनर्रचना प्रक्रिया ही महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम करण्यासाठी असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. .♦️महिलांच्या अधिकारांसाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून, हा विषय आता केवळ राजकीय राहिला नसून तो सामाजिक न्यायाचा भाग बनला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत महिला आरक्षण आणि परिसीमन (Delimitation) या विषयावरील चर्चेत सहभाग घेत या क्षणाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले.

राष्ट्राच्या जीवनात काही असे क्षण येतात जेव्हा समाजाची विचारसरणी आणि नेतृत्वाची क्षमता त्या संधीचे सोने करते. आजचा हा क्षण भारताच्या संसदीय लोकशाहीत एक मजबूत धरोहर (वारसा) म्हणून ओळखला जाईल. महिला आरक्षण विधेयक हे केवळ एक कायदा नसून तो महिलांच्या सन्मानाचा आणि समान संधीचा मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित पोस्ट

सुदर्शन आठवले यांना २०२४ चा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार जाहीर

महाचतुर एआय चॅटबॉटमुळे’ कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणिमार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• डाटा सुरक्षिततेसाठी ज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील भागीदार संस्थासोबत सामंजस्य करार

नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना-नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आवश्यक दुरुस्ती व देखभाल कामांमुळे काही विभागांमध्ये साप्ताहिक पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

लोकं नाही तर गडचिरोलीचा विकास धावत आहे – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल**गडचिरोली महामॅरेथॉनमध्ये १४ हजार नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग*

vishwatmaklokswamivarta

भगूर शहराच्या विकासाला नवी चालना मिळणार – उपमुख्यमंत्री अजित पवार पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी…

vishwatmaklokswamivarta