vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जिल्हा परिषद कृषी विभागाकडून खरीप हंगामाचे नियोजन

जिल्हा परिषद कृषी विभागाकडून खरीप हंगामाचे नियोजन

प्रतिनिधी, ठाणे (जिल्हा परिषद, ठाणे) : जिल्हा परिषद ठाणेच्या कृषी विभागामार्फत आगामी खरीप हंगामासाठी निविष्ठा नियोजन करण्यात आले असून आवश्यक निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर भात व तूर बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी तत्काळ सोडवण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष, तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्या आणि भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.ठाणे जिल्ह्यात खरीप हंगामाखाली सरासरी सुमारे ६०,००० हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी भात पिकाखालील सरासरी क्षेत्र ५५,००० हेक्टर आहे. मागील वर्षी ५५,१४३ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली होती. यंदाच्या हंगामातही सुमारे ५५,००० हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.

खत उपलब्धतेबाबत कृषी विभागाने ११,०८८ मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी केली असून शासनाकडून जिल्ह्यासाठी ११,५५० मेट्रिक टन खतसाठा मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये युरिया ९,७०० मेट्रिक टन, डीएपी २०० मेट्रिक टन, एमओपी ५० मेट्रिक टन, एसएसपी १०० मेट्रिक टन तसेच संयुक्त खते १,५०० मेट्रिक टन यांचा समावेश आहे.

बियाणे उपलब्धतेच्या दृष्टीने जिल्ह्यासाठी एकूण २२ हजार क्विंटल बियाण्यांच्या आवश्यकता असून महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ व खाजगी बियाणे उत्पादक कंपन्या साधारणपणे १५ हजार ते १६ हजार क्विंटल बियाणांचा पुरवठा करणार आहेत. उर्वरित सहा हजार क्विंटन बियाणे शेतकरी स्वतः कडील वापरणार आहेत. बियाणांची कोणत्याही प्रकारची कमतरता पडणार नाही हे सर्व बियाणे सुधारित व संकरीत दोन्ही प्रकारचे असेल.

खरीप हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी कृषी विभागामार्फत सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद ठाणेचे कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर यांनी केले आहे.

०००

संबंधित पोस्ट

आरटीई’ प्रवेशासाठी अर्ज सुरू; २७ तारखेपर्यंत करता येणार अर्ज*

vishwatmaklokswamivarta

मुंबई बंदर प्राधिकरणाच्या वतीने आसामला 60 वर्षांच्या भाडेतत्त्वावर मुंबईतील कुलाबा इथला भूखंड देण्याची केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची घोषणा

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात प्रतिज्ञा 

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली-कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले-जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

vishwatmaklokswamivarta

ऐरोली परिसरात मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भातअभ्यास अहवाल तयार करावा- वनमंत्री गणेश नाईक

भाजपा जालना महानगर जिल्ह्याच्या वतीने बिहार विधानसभेच्या विजयाचा जल्लोष…

vishwatmaklokswamivarta