vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

संकटात धावून येणारे कर्तव्यदक्ष व दानशूर आमदार श्री. रमेशआप्पा कराड साहेबांचा निकम कुटुंबीयांना माणुसकीचा हात!👏🏻🙇🏻‍♂️

संकटात धावून येणारे कर्तव्यदक्ष व दानशूर आमदार श्री. रमेशआप्पा कराड साहेबांचा निकम कुटुंबीयांना माणुसकीचा हात!👏🏻🙇🏻‍♂️

लातूर प्रतिनिधी-अवकाळी पाऊस आणि वादळ वाऱ्याच्या तडाख्यामुळे मौजे वानवाडा येथील अल्पभूधारक शेतकरी काशिनाथ सिद्धू निकम यांचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाला. घरावरील पत्र्याचे शेड उडून गेले, भिंती कोसळल्या, किराणा दुकान, पानटपरी आणि कष्टातून उभारलेला आरो प्लांट मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाला. अन्नधान्य, कपडे, अंथरूण-पांघरूण आणि संसारोपयोगी साहित्याचीही मोठी हानी झाली. 😢

अशा कठीण प्रसंगी जनतेच्या वेदना स्वतःच्या मानणारे, विकासासोबतच माणुसकीची नाळ जपणारे लातूर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार मा. श्री. रमेशआप्पा कराड साहेब तात्काळ मदतीसाठी धावून आले. निकम कुटुंबीयांच्या संसारासाठी लागणारे संपूर्ण आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत त्यांनी केवळ आर्थिक मदतच केली नाही, तर खचलेल्या कुटुंबाला नव्याने उभे राहण्याचे बळ आणि आत्मविश्वास दिला.

लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ विकासकामे करणारा नव्हे, तर जनतेच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना उभारी देणारा आधारवड असतो, याची प्रचिती पुन्हा एकदा श्री. रमेशआप्पा कराड साहेबांच्या कार्यातून आली. 🙇🏻‍♂️

संकटाच्या काळात दिलेला आधार हा आयुष्यभर लक्षात राहतो. निकम कुटुंबीयांच्या जीवनात आशेचा किरण बनून आलेल्या श्री. रमेशआप्पा कराड साहेबांच्या या माणुसकीपूर्ण कार्याबद्दल परिसरातून त्यांचे मनःपूर्वक कौतुक होत आहे.

0000

संबंधित पोस्ट

मिशन अयोध्या’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याची शोभा वाढविण्यासाठी प्रख्यात महंत परम पुज्य श्री रामगिरी महाराज विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार

पुर परिस्थितीबाबत ठाणे जिल्ह्यात अंमलबजावणीसाठी व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत,मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रशासन सतर्क

कामकाजात सुलभता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा – मंदार कुलकर्णी ‘शासकीय कामकाज प्रभावीपणे कसे करावे’ या विषयावर मार्गदर्शन

जिल्ह्यातील धरणात 152.78 दलघमी पाणीसाठा- पाच तालुक्यात 19 टँकरद्वारे पाणी पुरवठा- जिल्हा व तालुका प्रशासनाच्या उपाययोजना सुरु- पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन

राज्यातील जनतेला रमजान ईदच्याशुभेच्छा,मानवकल्याण, विश्वबंधुत्वासह सामाजिक ऐक्याचा संदेश जगाला देऊया – उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार 

शासन बळीराजाच्या खंबीरपणे पाठीशी – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे मालेगाव तालुक्यातील अमानी येथील शेतकऱ्यांशी संवाद

vishwatmaklokswamivarta