vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पुरेसा ओलावा झाल्यानंतरच पेरणी करा; शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

पुरेसा ओलावा झाल्यानंतरच पेरणी करा; शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

बुलढाणा,द प्रतिनिधी : खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा झाल्याशिवाय सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कपाशी आदी पिकांची पेरणी करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, शेतातील जमिनीमध्ये किमान ६ इंच ओलावा अथवा ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतरच पेरणी करणे आवश्यक आहे. पुरेसा ओलावा नसताना घाईघाईने पेरणी केल्यास जमिनीतील उष्णतेमुळे बियाण्यांचे अंकुरण कमी होण्याची किंवा अंकुर जळण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते.

यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि आर्थिक खर्च वाढण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. काही ठिकाणी शेतकरी धूळपेरणी करत असल्याचे निदर्शनास आले असून, अशा प्रकारची घाई टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात सध्या समाधानकारक पावसाची सुरुवात झाली असून, पावसाची स्थिती लक्षात घेऊनच पेरणीचे नियोजन करावे. जमिनीतील उष्णता कमी होऊन आवश्यक ओलावा निर्माण झाल्यानंतर सर्व प्रकारच्या खरीप पिकांची पेरणी करता येईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. संतोष डाबरे यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अल्पमुदतीच्या प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

गावे हरित करण्याचा संकल्प; पर्यावरण दिनापासून प्रत्येक गावात वृक्ष लागवड..

इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश,मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्गांचे रुंदीकरण, दुरुस्ती करुन तातडीची उपाययोजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय…

निवासी अतिक्रमणांचे नियमानुकूलन; महसूल कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण …

राष्ट्रीय युवा ॲथेलेटिक्स स्पर्धेत बुलढाण्याच्या नयनला रजत पदक

vishwatmaklokswamivarta

पोलीस व पत्रकारांनी निराधार वृद्धाला दिला वृद्धाश्रमाचा आधार पोटच्यानी केले निराधार तर परक्यानी दिला आधार..