vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

स्वाधार योजनेतील अर्जातील त्रुटी दुरुस्तीसाठी 4 मेपर्यंत मुदत..

स्वाधार योजनेतील अर्जातील त्रुटी दुरुस्तीसाठी 4 मेपर्यंत मुदत..

बुलढाणा प्रतिनिधी: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना” अंतर्गत शैक्षणिक सत्र 2025-26 साठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी 4 मे 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.

शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असूनही प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील इयत्ता 11 वी, 12 वी तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेद्वारे आर्थिक मदत दिली जाते. विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक खर्चासाठी आवश्यक रक्कम थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते.

या योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी शासनाने 26 डिसेंबर 2024 रोजीच्या निर्णयानुसार योजनेचा विस्तार तालुकास्तरावरही केला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी http://hmas.mahait.org या संकेतस्थळावर लॉगिन करून अर्जाची सद्यस्थिती तपासावी. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज Send Back झाले आहेत त्यांनी आवश्यक त्रुटी दुरुस्त करून 4 मे 2026 पूर्वी अर्ज पुन्हा ऑनलाईन सादर करावा. अर्ज फॉरवर्ड करण्यापूर्वी बँक खाते क्रमांक, IFSC कोड, खातेधारकाचे नाव यांसारखे तपशील अचूक भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरला आहे परंतु अर्जाची हार्डकॉपी व आवश्यक कागदपत्रे अद्याप कार्यालयात जमा केलेली नाहीत, त्यांनीही 4 मे 2026 पर्यंत ती सादर करावीत, असे समाजकल्याण सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी कळविले आहे.

0000

संबंधित पोस्ट

राहुरी पोटनिवडणुकीत प्रचारानंतर बाहेरील कार्यकर्त्यांवर निर्बंध

स्मार्ट’अंगणवाडीसाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

09 डिसेंबर रोजी कोकण विभागीय पेन्शन अदालत

vishwatmaklokswamivarta

शिक्षिकेची मरणोत्तर सामाजिक बांधिलकी- मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5 लाखांची देणगी

आज शुक्रवारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयएएस आकाश वर्मा, उपजिल्हाधिकारी सुनील टाकळे यांचे मार्गदर्शन

vishwatmaklokswamivarta

दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार कराल तर होईल गुन्हा दाखल विद्यार्थी, पालक,शिक्षकआणि नागरिकांना इशारा -जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी

vishwatmaklokswamivarta