vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील 187 गावांमध्ये ‘जन भागिदारी अभियान’Ø 18 ते 25 मे या कालावधीत विविध उपक्रम व शिबिरांचे आयोजन

जिल्ह्यातील 187 गावांमध्ये ‘जन भागिदारी अभियान’Ø 18 ते 25 मे या कालावधीत विविध उपक्रम व शिबिरांचे आयोजन

चंद्रपूर, प्रतिनिधी: अनुसूचित जमातींच्या सामाजिक व आर्थिक उत्कर्षासाठी ‘प्रधानमंत्री जनजातीय न्याय अभियान’ आणि ‘धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान’ यांचे एकत्रिकरण करून केंद्र शासनाच्यावतीने ‘आदि कर्मयोगी अभियान’ राबविण्यात येत आहे. आदि कर्मयागी अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 187 गावांमध्ये आदि सेवा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून या गावांमध्ये आता ‘जन भागिदारी अभियान’ राबविण्यात येणार आहे. आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी 18 ते 25 मे 2026 या कालावधीत सदर गावांमध्ये विविध उपक्रम व शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.या संदर्भात जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. 18) बैठक घेऊन सदर अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंके, गिरीश धायगुडे, सहायक प्रकल्प अधिकारी गिरीश पोळ, शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे, राजेश पाताळे आदी उपस्थित होते.

‘जन भागिदारी…सर्वात दूर, सर्वात पहिले’ या संकल्पनेवर आधारीत, जिल्ह्यातील 187 गावांमध्ये 19 ते 25 या कालावधीत गाव पातळीवर व्यापकता शिबिरे व आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येईल. 20 मे रोजी संबंधित अधिकारी कर्मचारी, आदि कर्मयागी व स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन शिवार फेरीचे आयेाजन, 21 मे 23 मे या कालावधीत आदि सेवा केंद्राकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचे निवारण आणि जलद निपटा-यासाठी दररोज सुनावणी, 24 मे रोजी दस्तऐवजीकरण व विविध प्रमाणपत्रांचे वाटप, तसेच 25 मे रोजी अभियानात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती पोर्टलवर अपडेट करणे, याबाबत नियोजन करण्यात आल्याचे सहायक प्रकल्प अधिकारी गिरीश पोळ यांनी सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत म्हणाल्या, आजपासून सुरू झालेले जन भागिदारी अभियान, आपापल्या क्षेत्रातील गावांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात यावे. संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी व इतर यंत्रणांनी आठवड्याभराचे नियेाजन करावे. विशेष शिबिरांचे आयोजन करून घरकुल, पट्टे वाटप, राशन कार्ड सोबतच अग्रीस्टॅक व फार्मर आयडीबाबतही मार्गदर्शन करावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.

जन भागिदारी अभियानाचे उद्दिष्ट्ये : 1) आदि सेवा केंद्र असलेल्या 187 गावांमध्ये योजनांची माहिती पोहचविणे 2) ग्रामपंचायत, सामाजिक संघटना, बचत गट यांच्या माध्यमातून जनजागृती 3) लाभार्थ्यांसाठी विविध शिबिरांचे आयोजन 4) तक्रार निवारण आणि हक्कांबाबत जागरुकता 5) आदि सेवा केंद्रात प्राप्त झालेल्या तक्रारींची जनसुनावणी व निवारण 6) आरोग्य तपासणी, सिकलसेल जागरुकता, पोषण संदेश 7) राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती पोर्टलवर अपडेट करणे.

संबंधित पोस्ट

दररोज राष्ट्रगीत गायन उपक्रमातून कर्नाळमध्ये देशभक्तीची जोपासना- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

व्हॉईस ऑफ मीडिया’च्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी वैभवराजे मोहिते सिद्धेश्वर पवारही नवीन जिल्हाध्यक्ष

vishwatmaklokswamivarta

आटपाडी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांची जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ सर्वेक्षण 2024’मध्ये आता स्वच्छ शहरांच्या नियमित क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ नवी मुंबई’**10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरात ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये समाविष्ट महाराष्ट्रातील एकमेव शहर**महामहिम राष्ट्रपती श्रीम.द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्विकारला सन्मान**यशाचे श्रेय सातत्य राखणा-या स्वच्छतामित्र, स्वच्छतासखी आणि सर्व नागरिकांचे*

vishwatmaklokswamivarta

महिंद्रा अँड महिंद्रा येथे इंटर्नशिप कॅम्प; ५१० जागांसाठी २० मे रोजी मुलाखती

मारवाडी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या शितला माता मंदिर परिसर स्वच्छता करा-विकासकुमार बागडी..