मुंबईत रेल्वेची प्रशासनाची दुसऱ्या दिवशीही मोठी कारवाई! मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वांद्रे स्थानक परिसरातील अवैध बांधकामे जमीनदोस्त दगडफेक करणाऱ्या वर पोलिसांचा लाठी चार्ज परिस्थिती नियंत्रणात…
मुंबईत रेल्वेची प्रशासनाची दुसऱ्या दिवशीही मोठी कारवाई! मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वांद्रे स्थानक परिसरातील अवैध बांधकामे जमीनदोस्त दगडफेक करणाऱ्या वर पोलिसांचा लाठी चार्ज परिस्थिती नियंत्रणात…
मुंबई प्रतिनिधी-मुंबईत रेल्वेची प्रशासनाची दुसऱ्या दिवशीही मोठी कारवाई! मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वांद्रे स्थानक परिसरातील अवैध बांधकामे जमीनदोस्त दगडफेक करणाऱ्या वर पोलिसांचा लाठी चार्ज परिस्थिती नियंत्रणात…मुंबईत रेल्वेची प्रशासनाची दुसऱ्या दिवशीही मोठी कारवाई! मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वांद्रे स्थानक परिसरातील अवैध बांधकामे जमीनदोस्त दगडफेक करणाऱ्या वर पोलिसांचा लाठी चार्ज परिस्थिती नियंत्रणात…
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वांद्रे स्थानक परिसरातील काल सुमारे ५०० अवैध बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली त्यानंतर पुन्हाच कारवाई सुरू झाली आजच्या दुसऱ्या दिवशी बेकायदेशीर बांधकामे हटवताना स्थानिक तरुणांनी प्रशासन आणि अधिकाऱ्यांवर दगडफेक केली त्यानंतर मात्र प्रशासनाने वारंवार समजावून सांगितले तरी सुद्धा दगडफेक सुरू असल्याने शेवटी नाईलाजाने पोलिसांनी लाठीचार्ज केला
दरम्यान पश्चिम रेल्वेच्या वतीने मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानक आणि परिसरातील रेल्वेच्या जमिनीवर दीर्घकाळापासून असलेले अतिक्रमण हटवण्यासाठी आज एक मोठी आणि कायदेशीर मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि रीतसर कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून ही कारवाई केली जात आहे.
तर विभागातील परिस्थिती अशी आहे की,आज दुसऱ्या दिवशीही वांद्रे पूर्व येथील रेल्वे लगतच्या झोपड्यांवर कारवाई सुरू
वांद्रे रेल्वे स्टेशनबाहेर अनेक वर्षांपासून असलेल्या ‘गरीब नगर’ या अत्यंत संवेदनशील झोपडपट्टीवर अखेर प्रशासन आणि रेल्वेने मिळून बुलडोझर चालवला आहे! अवघ्या काही तासांत शेकडो बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.
पण या कारवाईने मुंबईत एक नवा वाद पेटवला आहे!एककीडे लाखो रेल्वे प्रवाशांची सुरक्षा, वारंवार लागणाऱ्या भीषण आगींचा धोका आणि स्टेशन परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी हे पाऊल अत्यंत गरजेचे होते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. पण दुसरीकडे, ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शेकडो गरीब कुटुंबे आणि लहान मुले आज एका झटक्यात बेघर झाली आहेत!