vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मान्सून पूर्वतयारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज मोती तलाव येथे आपत्कालीन शोध व बचाव साहित्याची रंगीत तालीम संपन्न..

मान्सून पूर्वतयारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज मोती तलाव येथे आपत्कालीन शोध व बचाव साहित्याची रंगीत तालीम संपन्न..

 

जालना, प्रतिनिधी: आगामी मान्सून कालावधीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तात्काळ व प्रभावी प्रतिसाद देता यावा, तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम व सज्ज राहावी यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आशिमा मित्तल

यांच्या निर्देशानुसार व जालना शहर महानगरपालिका आयुक्तअंजली शर्मा, निवासी उपजिल्‍हाधिकारी तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण शशिकांत हदगल यांच्या मार्गदर्शनाखाली जालना शहरातील मोती तलाव येथील विसर्जन कुंड परिसरात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशमन विभाग, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्कालीन शोध व बचाव साहित्याची भव्य रंगीत तालीम आयोजित करण्यात आली होती.

यावेळी जिल्हाधिकारीआशिमा मित्तल, मनपा आयुक्तअंजली शर्मा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दिपक काजळकर तसेच अग्निशमन अधिकारी संदीप दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.याशिवाय अग्निशमन विभाग, जालना, बदनापूर व अंबड येथील अधिकारी व कर्मचारी, तसेच रायगड येथे प्रशिक्षण पूर्ण करून आलेले ‘आपदा मित्र’ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.रंगीत तालीमेदरम्यान पूर, अतिवृष्टी, पाण्यात अडकलेल्या नागरिकांचा बचाव, आपत्कालीन स्थलांतरण तसेच नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी वापरण्यात येणाऱ्या अत्याधुनिक शोध व बचाव साहित्यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यामध्ये फायबर बोट, इन्फ्लाटेबल रबर बोट, स्कुबा सेट, फायर जेल ब्लॅंकेट, लाईफबोये, बॅटरी कटर, बॅटरी स्प्रेडर, फ्लोटींग पंप, पोर्टेबल जनरेटर, पोर्टेबल पंप, मेगाफोन, सेफ्टी नेट, लाईफ जॅकेट व रिफ्लेक्टर जॅकेट आदी साहित्यांच्या कार्यपद्धती व वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीचा सुरक्षितरित्या बचाव कसा करावा, पूरस्थितीत रबर बोटीद्वारे नागरिकांचे स्थलांतरण कशा पद्धतीने करावे, आपत्कालीन परिस्थितीत समन्वय साधून तात्काळ प्रतिसाद कसा द्यावा याबाबत अग्निशमन विभागामार्फत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले.

मान्सून कालावधीत उद्भवणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी तसेच नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात येत असून, अशा प्रकारच्या रंगीत तालीम व प्रशिक्षण उपक्रमांमुळे आपत्ती प्रतिसाद यंत्रणांमध्ये समन्वय, तत्परता व कार्यक्षमता अधिक बळकट होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

0000

संबंधित पोस्ट

शासनाच्या धोरणात्मक निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करूनछत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान यशस्वी करावे- महसूल राज्यमंत्री योगेश कदम- भिवघाट, आटपाडी येथे महाराजस्व अभियानांतर्गत लाभार्थींना लाभ वाटप 

सामाजिक ऋण चुकविण्याचा रायगड डाक विभागाचा अनोखा पायंडा

परिवहन व बंदरे विभाग-राज्यात ॲप बेस वाहनांसाठी धोरण लागू

बुलढाण्यातील दुर्दैवी धक्कादायक घटना- आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं…

vishwatmaklokswamivarta

महिला स्वयंसहायता गटांच्या उत्पादन विक्री व प्रदर्शनाचे आयोजन

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे“आदर्श जिल्हा” आणि “उत्तम कार्यकर्ता” पुरस्कार जाहीरठाणे जिल्हा समन्वय समितीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

vishwatmaklokswamivarta