
पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात बोट उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त पंतप्रधानांनी केली मदतीची घोषणा
नवी दिल्ली प्रतिनिधी –
पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात बोट उलटल्याने झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधानांनी या दुःखद प्रसंगी शोकाकुल कुटुंबियांप्रति आपल्या संवेदना व्यक्त केल्या आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली.
पंतप्रधानांनी जाहीर केले की प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील.
पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले :
“पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात बोट उलटल्याने झालेली जीवितहानी अत्यंत दुःखद आहे. या दुःखाच्या प्रसंगी माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी.पीएमएनआरएफकडून प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील:
0000



