vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बेकायदेशीर प्लॉट विक्रीतून कोट्यवधींची फसवणूक  कारवाई न झाल्यास विभागीय आयुक्त  कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा

बेकायदेशीर प्लॉट विक्रीतून कोट्यवधींची फसवणूक

 कारवाई न झाल्यास विभागीय आयुक्त

कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा…

जालना (प्रतिनिधी) : जालना तालुक्यातील मौजे इंदेवाडी येथील कथित बेकायदेशीर प्लॉट विक्री प्रकरणात तातडीने कारवाई करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा २२ जुलै २०२६ पासून छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा राहुल भास्कर साने यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

साने यांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गट क्रमांक ८२ मध्ये लक्ष्मीनगर, साईनगर, शिवशंकर नगर, संभाजीराजे नगर, शिवाजीराजे नगर तसेच गट क्रमांक ९६ मध्ये गोकुळ नगर या नावाने प्लॉटिंग योजना राबविण्यात आली. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार या जमिनींना बिनशेती (एन.ए.) परवानगी नसतानाही प्लॉट विक्री करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या बेकायदेशीर व्यवहारामुळे हजारो सर्वसामान्य नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा करत, संबंधित जमीनमालक शेख मुश्ताक शेख आमीर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून सर्व बेकायदेशीर प्लॉट विक्री रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात ३ जून व १२ जून २०२६ रोजीही निवेदने देऊनही प्रशासनाने कोणताही निर्णय घेतला नसल्याचा आरोप साने यांनी केला आहे. त्यामुळे न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

संबंधित पोस्ट

अल्पसंख्याक विकास विभागाद्वारे ‘गेटवे ऑफ इंडिया’ समोर विशेष कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

सांगलीच्या स्मृती सदैव स्मरणात राहतील- मावळते जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

गिरणी कामगारांना मुंबईत घरे उपलब्ध करून देण्याबाबत‘एनटीसी’समवेत तातडीने बैठक घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश…

🌧️ पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य! 🚨छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पावसाळी नियंत्रण कक्षाचा मा. आयुक्तांनी आढावा घेत आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्देश दिले.

भाजपाचे हिमंता बिसवा सर्मा यांनी सलग दुसऱ्यांदा आसामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. चार मंत्र्यांचाही शपथविधी. 

मेळघाटच्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्नकरणार*जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत विविध विषयांवर चर्चा