vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील १५२ प्रकल्पबाधित कुटुंबांना ६.८३ कोटी रुपयांचे स्वेच्छा पुनर्वसन अनुदान मंजूर – मंत्री मकरंद जाधव-पाटील

नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील १५२ प्रकल्पबाधित कुटुंबांना ६.८३ कोटी रुपयांचे स्वेच्छा पुनर्वसन अनुदान मंजूर – मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबई प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील पाच गावांमधील १५२ प्रकल्पबाधित कुटुंबांना स्वेच्छा पुनर्वसनासाठी एकूण ६ कोटी ८३ लाख १ हजार ८८७ रुपये अनुदान मंजूर करण्यात आल्याचा शासन निर्णय मदत व पुनर्वसन विभागाने निर्गमित केला आहे. याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणात विशेष पाठपुरावा केल्याचेही मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले.

या प्रकल्पामुळे नरडवे, जांभळगाव, भैरवगाव, यवतेश्वर आणि दुगनगर ही पाच गावे बाधित झाली आहेत. एकूण ९६१ प्रकल्पबाधित कुटुंबांपैकी १५२ कुटुंबांनी स्वेच्छा पुनर्वसनाचा पर्याय स्वीकारला आहे.मंजूर अनुदानामध्ये घरांसाठी ६ कोटी ५५ लाख १५ हजार ७२० रुपये, तर जमिनीबाबत २७ लाख ८६ हजार १६७ रुपये अनुदानाचा समावेश आहे. नरडवे येथील ८४, जांभळगाव येथील १६, भैरवगाव येथील २, यवतेश्वर येथील ४ आणि दुगनगर येथील ४६ कुटुंबांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

मंजूर अनुदानाची रक्कम जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे प्रकल्पबाधित कुटुंबांच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळण्यासोबतच नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे काम नियोजनानुसार पूर्ण करण्यास मदत होणार आहे.

प्रकल्पबाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, त्यांना न्याय व वेळेत मदत मिळावी यासाठी शासन कटिबद्ध आहे. या निर्णयामुळे १५२ प्रकल्पबाधित कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या पुनर्वसन प्रक्रियेलाही गती मिळणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.

शासन निर्णय : https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202609031459269941.pdf

0000

संबंधित पोस्ट

सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे 6 जूनला जिल्ह्यात ‘मेगा कृषी क्रेडिट आउटरीच कॅम्प’सर्व 45 शाखांमध्ये जागेवरच होणार कर्जवाटप

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्य अभियंता मृद व जलसंधारण यांचे कार्यालय कार्यान्वित

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन

दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांन शोधून काढेल आणि शिक्षा करेल. आम्ही शेवटापर्यंत त्यांचा पाठलाग करू. दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही. दहशतवादाला शिक्षा ही होणारच. न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने १ लाख दिव्यांगांना कृत्रिम अवयव वितरण**दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न* 

vishwatmaklokswamivarta