दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांन शोधून काढेल आणि शिक्षा करेल. आम्ही शेवटापर्यंत त्यांचा पाठलाग करू. दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही. दहशतवादाला शिक्षा ही होणारच. न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांन शोधून काढेल आणि शिक्षा करेल. आम्ही शेवटापर्यंत त्यांचा पाठलाग करू. दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही. दहशतवादाला शिक्षा ही होणारच. न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
[ राज्य प्रतिनिधी-बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात पंचायती राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्यांसाठी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या मधुबनी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर जोरदार टीका केली.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये दहशतवाद्यांनी 26 निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी घेतला. या घटनेमुळे संपूर्ण देश दुःखी आहे. जगभरातून हा हल्ल्याबाबत निंदा होत आहे. आता पीएम नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर भाष्य केले आहे
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल पंतप्रधान मोदी म्हणतात, ‘आज, बिहारच्या भूमीवर, मी संपूर्ण जगाला सांगतो की, भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांना ओळखेल, शोधून काढेल आणि शिक्षा करेल. आम्ही शेवटापर्यंत त्यांचा पाठलाग करू. दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही. दहशतवादाला शिक्षा ही होणारच. न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
या आमच्या संकल्पात संपूर्ण राष्ट्र एक आहे. मानवतेवर विश्वास ठेवणारा प्रत्येकजण आपल्यासोबत आहे. विविध देशांच्या लोकांचे आणि त्यांच्या नेत्यांचे मी आभार मानतो जे आपल्यासोबत उभे राहिले आहेत.’