vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांन शोधून काढेल आणि शिक्षा करेल. आम्ही शेवटापर्यंत त्यांचा पाठलाग करू. दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही. दहशतवादाला शिक्षा ही होणारच. न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

 दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांन शोधून काढेल आणि शिक्षा करेल. आम्ही शेवटापर्यंत त्यांचा पाठलाग करू. दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही. दहशतवादाला शिक्षा ही होणारच. न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

[ राज्य प्रतिनिधी-बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात पंचायती राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्यांसाठी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या मधुबनी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर जोरदार टीका केली.

 जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम  येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये दहशतवाद्यांनी 26 निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी घेतला. या घटनेमुळे संपूर्ण देश दुःखी आहे. जगभरातून हा हल्ल्याबाबत निंदा होत आहे. आता पीएम नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर भाष्य केले आहे

 पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल पंतप्रधान मोदी म्हणतात, ‘आज, बिहारच्या भूमीवर, मी संपूर्ण जगाला सांगतो की, भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांना ओळखेल, शोधून काढेल आणि शिक्षा करेल. आम्ही शेवटापर्यंत त्यांचा पाठलाग करू. दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही. दहशतवादाला शिक्षा ही होणारच. न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

या आमच्या संकल्पात संपूर्ण राष्ट्र एक आहे. मानवतेवर विश्वास ठेवणारा प्रत्येकजण आपल्यासोबत आहे. विविध देशांच्या लोकांचे आणि त्यांच्या नेत्यांचे मी आभार मानतो जे आपल्यासोबत उभे राहिले आहेत.’

संबंधित पोस्ट

पुण्यातील खळबळ जनक बातमी : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार सहा आरोपींना केली अटक…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यतारद्द होण्याची शक्यता ? विधानसभा निवडणुकीत अपयश…

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादी पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या एम एस आर टी सी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले जाणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

महसूल प्रशासनाची सतर्कता-आपत्तीच्या परिस्थितीत नवऱ्याला शोधायला बाहेर पडलेल्या आजींना दिला दिलासा..

ग्रीनलँड-इंग्लिश स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी…

विकसित महाराष्ट्र २०४७-युवा व क्रीडा संवादा’ची नागपुरातून सुरुवात क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी साधला मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्याशी थेट संवाद

vishwatmaklokswamivarta