vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सेनेचे खासदार संजय राऊतांचा जामीन रद्द होणार? ईडीच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी!

:शिवसेनेचे खासदार  संजय राऊतांचा जामीन रद्द होणार? ईडीच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी!

मुंबई प्रतिनिधी

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी खासदार संजय राऊत यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी खासदार संजय राऊत यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडी पूर्ण प्रयत्न करणार आहे. राऊत यांच्याविरोधात पुरावे असूनही सत्र न्यायालयानं त्यांना जामीन दिल्याचं सांगत ईडीनं उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता उच्च न्यायालय नेमका काय निकाल देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

 

संजय राऊत यांची पत्राचाळ घोटाळाप्रकरणी अटक थेट बेकायदेशीर ठरवत पीएमएलए कोर्टानं ईडीला धक्का दिला होता. यामुळे ईडीच्या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ९ नोव्हेंबर २०२२ रोजी संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला होता आणि संजय राऊत १०० दिवसांनी तुरुंगाबाहेर आले.

संजय राऊत यांच्या जामीन प्रकरणावर सुनावणी घेताना विशेष सत्र न्यायालयाने ईडीला झापलं होतं. पत्राचाळ प्रकरणी दोन्ही आरोपींना बेकायदेशीररीत्या अटक करण्यात आली आहे. दिवाणी खटले हे मनी लॉन्डरिंग किंवा आर्थिक गुन्हे अशा नावाखाली आणून निर्दोष लोकांना त्यात ओढून त्यांना अटक करून अशा परिस्थितीत आणणं हे न्यायालय मान्य करू शकत नाही, असं कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं होतं.

 

संबंधित पोस्ट

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण मार्गावर अजून 3 ट्रेन्सची घोषणा; 15 ऑगस्ट पासुन तिकीट बुकिंग होणार सुरू

राम मंदिरासाठी मुख्यमंत्रिपद लावले पणाला, हिंदुत्वाचा जोर दाखवला, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थान व हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांचे निधन झाले. २३ ऑगस्ट रोजी नरौला येथील गंगा किनाऱ्यावर अंत्यसंस्कार केले जाणार.

vishwatmaklokswamivarta

सनातन धर्माला नष्ट करू पहाणार्‍यांच्या विरोधात प्रत्येक मंदिराकडून गुन्हा दाखल करणार ! – ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चा एकमुखी प्रस्ताव संमत…

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, सचिवांना दिलेले विशेष अधिकार पुन्हा मंत्र्यांकड…

vishwatmaklokswamivarta

महाविकास आघाडीचे सरकार पडून राज्यात केव्हाही निवडणूक लागू शकते. आशिष शेलार 

मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालये यांना उद्या दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुटी !

vishwatmaklokswamivarta