vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

देशाच्या कानाकोपऱ्यात भगवान हनुमानाची जयंती  शुभेच्छा,भारताच्या विकासाच्या प्रवासात हनुमानजींचं जीवन आजही आपल्याला प्रेरणा देतं.’ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

 देशाच्या कानाकोपऱ्यात भगवान हनुमानाची जयंती  शुभेच्छा,भारताच्या विकासाच्या प्रवासात हनुमानजींचं जीवन आजही आपल्याला प्रेरणा देतं.’ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली प्रतिनिधी : भाजपच्या स्थापना दिनानिमित्त  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कार्यकर्त्यांना संबोधित केलं. स्थापना दिनाच्या शुभेच्छा देताना मोदी म्हणाले, ‘आज आपण देशाच्या कानाकोपऱ्यात भगवान हनुमानाची जयंती  साजरी करत आहोत. भारताच्या विकासाच्या प्रवासात हनुमानजींचं जीवन आजही आपल्याला प्रेरणा देतं.’

मोदी म्हणाले, ‘जेव्हा लक्ष्मणजींवर संकट आलं, तेव्हा हनुमानजींनी संपूर्ण पर्वत वाहून नेला. याच प्रेरणेतून भाजपनंही जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलाय आणि यापुढंही सुरू ठेवणार आहे. हनुमानजींच्या सामर्थ्याप्रमाणंच आज भारताला आपल्या सामर्थ्याची जाणीव होत आहे.’
हनुमानजींकडून प्रेरणा मिळते’भ्रष्टाचार आणि कायदा सुव्यवस्थेशी लढण्यासाठी भाजपला (BJP) हनुमानापासून प्रेरणा मिळते. जर आपण भगवान हनुमानाच्या संपूर्ण जीवनावर नजर टाकली, तर त्यांच्याकडं “Can Do” वृत्ती होती, त्यामुळं त्यांना सर्व प्रकारचं यश मिळण्यास मदत झाली. आमचा पक्ष भारत माता, संविधान आणि राष्ट्रासाठी समर्पित आहे, असंही त्यांनी सांगितलं.
मोदी पुढं म्हणाले, ‘आज भारत बजरंग बली सारख्या महासत्तेची जाणीव करून देत आहे. सागरासारख्या मोठ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत मजबूत झाला आहे. आमचा पक्ष, आमचे कार्यकर्ते हनुमानजींची मूल्ये आणि शिकवणीतून सतत प्रेरणा घेत आहेत.’

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राला देशाची हरित ऊर्जा राजधानी बनविण्याचे उद्दिष्ट- अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील  श्री मलंगगड येथे माघी पौर्णिमेनिमित्त  श्री मलंगगड उत्सवाला उपस्थित राहून श्रीमलंग मच्छिंद्रनाथांचे भक्तीभावाने दर्शन घेऊन मनोभावे महाआरती. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते करण्यात आले

vishwatmaklokswamivarta

महाविकासआघाडीला झटका, मुंबईत वाढवण्यात आलेल्या वार्डची अँटी चौकशीचे आदेश…

मराठवाडा विभागात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उद्दिष्ट पूर्ण करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

स्वच्छ, पर्यावरणशील, प्लास्टिकमुक्त दिवाळीसाठी नवी मुंबईकरांना आवाहन आणि महापालिकेकडून उपाययोजना-मुख्य रस्ते साफसफाई व प्रक्रियाकृत पाण्याने धुण्यामुळे वायू प्रदूषणाचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांकडून समाधान

vishwatmaklokswamivarta

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले त्या प्रभाकर साईल याचा मृत्यू की आत्महत्या? संशयाचे गूढ वाढले

vishwatmaklokswamivarta