
शहापूर तालुक्यातील भातसा प्रकल्पाच्या97 प्रकल्पग्रस्तांपैकी 43 प्रकल्पग्रस्तांना झाले भूखंडाचे वाटप,उर्वरित प्रकल्पग्रस्तांनी वारस नोंदीसाठी आवश्यक कागदपत्रेजिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन
ठाणे, प्रतिनिधी :- शहापूर तालुक्यातील भातसा प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांना काल दि.13 डिसेंबर 2023 रोजी भूखंडाचे वाटप करण्यात आले. 1967 साली भातसा प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात आले होते, त्यावेळी त्यांना जमिनीचा मोबदला देण्यात आला होता. मात्र त्यांचे पुनर्वसन दुसऱ्या ठिकाणी करण्यासाठीची मागणी होती. त्याप्रमाणे त्यांना भातसा नगर येथे 97 भूखंड पाडण्यात येऊन त्या भूखंडाचे हस्तांतरण आज दि. 13 डिसेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) श्रीम.रेवती गायकर यांनी दिली आहे.
या 97 प्रकल्पग्रस्तांपैकी 43 प्रकल्पग्रस्तांना काल दि. 13 डिसेंबर 2023 रोजी भूखंडाचे प्रत्यक्ष ताबे देण्यात आले. इतर प्रकल्पग्रस्त मयत असून त्यांचे वारस तपास काम सुरू आहे . मात्र त्यांचे वारस सापडत नसल्याने भूखंड वाटपास विलंब होत आहे. तरी संबंधित प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या मूळ मयत प्रकल्पग्रस्तांच्या वारसांच्या नोंदी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेत जमा करावेत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) श्रीम.रेवती गायकर यांनी केले आहे.
0000000000
वृत्त क्र.982/2023



