vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

लोकसभा निवडणूक कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू

लोकसभा निवडणूक कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू

 

बुलडाणा, प्रतिनिधी  :

लोकसभा निवडणूक 2024ची घोषणा झाली असून दि. 16 मार्च पासून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी यांना प्राप्त अधिकारानुसार जिल्ह्यात मुंबई पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) लागू करण्यात आले आहे.

 

जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी, तसेच मतदारसंघाचे मतदार नसतील अशा व्यक्तींनी कोणत्याही प्रकारच्या राजकीय सभा घेऊ नये. जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहणे आवश्यक असल्याने दि. 26 एप्रिल 2024 रोजी बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राहण्याच्या दृष्टीने तसेच लोकसभा निवडणूक निर्भय व नि:पक्षपातीपणे पार पाडण्याच्या दृष्टीने राजकीय नेते आणि कार्यकर्ते या मतदारसंघाचे मतदार नसतील, अशा व्यक्तींनी मतदानाचा दिनांक आणि मतदान संपण्याच्या 48 तास अगोदर म्हणजे दि. 24 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेनंतर कोणत्याही प्रकारच्या राजकीय सभा घेऊ नये. तसेच मतदानाचा निश्चित केलेल्या दिनाकाच्या 48 तासाच्या अगोदर सदर मतदारसंघ सोडून जाण्याचे आदेश करण्यात आले आहे.

 

सदर बंदी आदेश संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याकरीता मलकापूर विधानसभा मतदारसंघ वगळून दि. 24 एप्रिल 2024 रोजीचे सकाळी 6 वाजेपासून ते दि. 26 एप्रिल 2024 च्या रात्री 22.00 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती मुंबई पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 135 व भारतीय दंड संहिता, 1860चे कलम 188 नुसार कार्यवाहीस पात्र राहणार आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

जय जय महाराष्ट्र माझा…गर्जा महाराष्ट्र माझा…महाराष्ट्र दिनानिमित्त आज मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सर्व १०६ हुतात्म्यांना हुतात्म्या स्मारकाला भेट देऊन विनम्रपणे अभिवादन

काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष; आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

vishwatmaklokswamivarta

देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे भारत पर्यटनकडून बी2बी पर्यटन मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी:बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला यश

समाजातील प्रत्येक व्यक्तीला जगविण्याची जबाबदारी ही समाजाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अग्निपथवर होणार मोठा निर्णय? लष्कराच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांची पत्रकार परिषद