vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

32 रायगड लोकसभा मतदारसंघ मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

32 रायगड लोकसभा मतदारसंघ मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

 

 

 

रायगड प्रतिनिधी):-32 रायगड लोकसभा मतदारसंघासाठी मतदान सात मे रोजी होणार असून यासाठी प्राप्त मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया

 

जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे , निवडणूक निरीक्षक सर्वसाधारण संजीव कुमार झा , निवडणूक खर्च निरीक्षक धीरेंद्रमणी त्रिपाठी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात संपन्न झाली.

 

32 रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणुकीतील मतदान प्रक्रियेसाठी मतदार संघात एकूण 3 हजार 47 बॅलेट युनिट, 3 हजार 47 कंट्रोल युनिट व 3 हजार 206 व्हीव्हीपॅट प्राप्त प्राप्त झाले आहेत. त्याची प्रथम सरमिसळ प्रक्रिया यापूर्वी झाली आहे. आजच्या प्रक्रियेदरम्यान मतदार केंद्र निहाय देण्यात येणाऱ्या मतदान यंत्राच्या क्रमांकाची इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सरमिसळ प्रक्रिया करण्यात आली.

 

याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा खर्च सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी राहुल कदम,आदर्श आचारसंहिता कक्षाचा नोडेल अधिकारी श्रीमती जोत्स्ना पडीयार, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांच्या सह राजकीय पक्षाचे उमेदवार व प्रतिनिधी, विविध पोलीस व शासकीय अधिकारी उपस्थित होते.

 

0000000

संबंधित पोस्ट

एल्डर लाईन – १४५६७; ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन

महाराष्ट्र राजभवनचे नाव ‘लोकभवन’ करण्यात आल्यानंतर प्रथमच तयार केलेल्या ‘महाराष्ट्र लोकभवन’ दिनदर्शिकेचे प्रकाशन…

कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजपा पहिल्या क्रमांकावर आल्याचं सांगत आता मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही.

vishwatmaklokswamivarta

नवीन पाच पोलीस चौकींमुळे नागपुरच्या सुरक्षिततेला मिळणार बळ – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पाच पोलीस चौकींचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

कलकत्ता येथील डॉक्टर चे सामुहिक बलात्कारानंतर हत्या या कोलकाता प्रकरणात पीडितेच्या वडिलांनी धक्कादायक खुलासा…

शासन आपल्या दारी”अभियानाच्या यशस्वीततेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी उत्कृष्ट योगदान द्यावे –खासदार डॉ.श्रीकांत शिंदे ठाणे जिल्ह्यात कल्याण येथे 3 मार्च रोजी “शासन आपल्या दारी” उपक्रमाचे होणारभव्य आयोजन

vishwatmaklokswamivarta