vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

सायबर जागरुकता कार्यशाळा संपन्नई-गव्हर्नन्स सेवांची सायबर सुरक्षितता  राखण्यासाठी नेहमी दक्षता बाळगावी-जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री. सपकाळ

सायबर जागरुकता कार्यशाळा संपन्नई-गव्हर्नन्स सेवांची सायबर सुरक्षितता  राखण्यासाठी नेहमी दक्षता बाळगावी-जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री. सपकाळ

जालना, प्रतिनिधी :- नागरिक, शासकीय कर्मचारी, मुले तसेच तरुणांमध्ये इंटरनेटच्या सुरक्षित आणि जबाबदारीने वापराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी सुरक्षित इंटरनेट दिनाचे आयोजन केले जाते. तरी शासकीय कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या ई-गव्हर्नन्स सेवांची सायबर सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी उन्मेश सपकाळ यांनी केले.

जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, जिल्हा कोषागार अधिकारी पंजाब पुंडगे, तहसीलदार प्रणाली तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेचे सादरीकरण व तांत्रिक मार्गदर्शन जिल्हा सूचना-विज्ञान अधिकारी उन्मेश सपकाळ यांनी केले. सुरक्षीत ई-मेल वापर, सुरक्षीत पासवर्ड, सुरक्षीत डेस्कटॉप, सायबर गुन्हेगारी, समाज माध्यमांचा वापर आदि विषयक तांत्रिक बाबींवर श्री. सपकाळ यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेचा उद्देश नवीन ऑनलाइन समस्या आणि समाज माध्यमांच्या चिंताबद्दल जागरूकता निर्माण करणे असा आहे. यावर्षी सुरक्षित इंटरनेट दिन दि. 11 फेब्रुवारी 2025 रोजी “टुगेदर फॉर अ बेटर इंटरनेट” या थीम अंतर्गत जालना जिल्ह्यात साजरा केला गेला. सायबर जागरुकता कार्यशाळेस मोठ्या संख्येने अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

ज्या महाराष्ट्रात थोडा जरी आरोप झाला तरी मंत्रीपदाचा राजीनामा घेतलाvजायचा आज त्याच महाराष्ट्रात अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप होऊनही राजीनामा घेतला जात नाही ही सत्ताधार्‍यांची हतबलता :-जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

आज 23 ऑगस्ट भारतात चांद्रयान-3 च्या चंद्रावरील यशस्वी लँडिंगच्या स्मरणार्थ “राष्ट्रीय अंतराळ दिन” साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवसाच्या निमित्ताने नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती, 20 हजार 787 कोटींची तरतूद राज्यातील 12 जिल्ह्यांना जोडणारा 802 कि.मी.चा द्रूतगती मार्ग..

जिल्हास्तरीय मुस्लिम धार्मिक तबलीगी इज्तेमा कार्यक्रम दि.३ ते ५ दरम्यान आयोजीत वाहतूक मार्गात बदल…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी राजेंद्र राख यांची निवड*