vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड-किल्ल्यांना नामांकन !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड-किल्ल्यांना नामांकन !

नवी दिल्ली प्रतिनिधी- पॅरिस येथे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड किल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा दर्जा मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ पॅरिसला दाखल झाले आहे.

आज वर्ल्ड हेरिटेज कमिटीचे सदस्य आणि युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांना शिष्टमंडळ भेटले. महाराष्ट्र आणि मुंबईचे सुपुत्र असलेल्या श्री. शर्मा यांच्यासह, केंद्र सरकारच्या प्रयत्नाने आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने आपले महाराज राजे शिवछत्रपती यांच्या १२ गड किल्ल्यांचे जागतिक वारसामध्ये नामांकन झाले आहे, असे मंत्री ॲड.शेलार यांनी म्हटले आहे. त्यावर पूर्णपणे निर्णय होणे बाकी आहे, त्याबद्दलचे सादरीकरण व यासंबंधित पुढील टप्प्यातील तयारीसाठी आज शिष्टमंडळासोबत आम्ही येऊन चर्चा केली, असेही ॲड.शेलार यांनी सांगितले.

यावेळी शिष्टमंडळ सदस्य म्हणून अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उप संचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद श्रीमती शिखा जैन उपस्थित होत्या.

संबंधित पोस्ट

भारताची पहिलीने सर्वात पहिले स्वदेशी सर्वेक्षण नौका (एसव्हीएल)एनआयएस संधायक मलेशियातील क्लांग बंदराला भेट दिली

भारताच्या इनोव्हेशन इंडेक्स 2021 मध्ये स्थान मिळविणाऱ्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र बंद पुकारण्याची महाविकास आघाडी ची भूमिका चुकीची; सरकारच राज्यात बंद कसा पुकारू शकते? — केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले*

vishwatmaklokswamivarta

भारतीय रेल्वेकडून तब्बल 169 रेल्वे गाड्या रद्द, जाणून घ्या रद्द करण्यात आलेल्या ट्रेनची यादी

vishwatmaklokswamivarta

दांगट समितीचा अहवाल तत्वत: स्वीकारण्यात येणार- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

कल्याणमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार करुन  हत्या,राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्दैवी घटनेवर तीव्र प्रतिक्रिया…

vishwatmaklokswamivarta