vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड-किल्ल्यांना नामांकन !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड-किल्ल्यांना नामांकन !

नवी दिल्ली प्रतिनिधी- पॅरिस येथे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड किल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा दर्जा मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ पॅरिसला दाखल झाले आहे.

आज वर्ल्ड हेरिटेज कमिटीचे सदस्य आणि युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांना शिष्टमंडळ भेटले. महाराष्ट्र आणि मुंबईचे सुपुत्र असलेल्या श्री. शर्मा यांच्यासह, केंद्र सरकारच्या प्रयत्नाने आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने आपले महाराज राजे शिवछत्रपती यांच्या १२ गड किल्ल्यांचे जागतिक वारसामध्ये नामांकन झाले आहे, असे मंत्री ॲड.शेलार यांनी म्हटले आहे. त्यावर पूर्णपणे निर्णय होणे बाकी आहे, त्याबद्दलचे सादरीकरण व यासंबंधित पुढील टप्प्यातील तयारीसाठी आज शिष्टमंडळासोबत आम्ही येऊन चर्चा केली, असेही ॲड.शेलार यांनी सांगितले.

यावेळी शिष्टमंडळ सदस्य म्हणून अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उप संचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद श्रीमती शिखा जैन उपस्थित होत्या.

संबंधित पोस्ट

उष्णतेच्या लाटेच्या प्रतिसादासाठी मार्गदर्शक सूचनांची कोटेकोर अंमलबजावणी करा    – जिल्हाधिकारी संतोष पाटील

जळगावच्या सुजाता बागूल यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान..

रस्ता सुरक्षा अभियान २०२५-सुरक्षितता बाळगण्यात आहे ‘हिरोगिरी’- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

नांदेड शहरात जड वाहनांना #प्रवेशबंदी   

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी,पात्र विद्यार्थ्यांना त्रुटी पुर्ततेसाठी अंतिम संधी

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा-अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन