vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भक्ती, परंपरा आणि आनंदाने भारलेली दिंडी – पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग

भक्ती, परंपरा आणि आनंदाने भारलेली दिंडी – पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग

जालना, (प्रतिनिधी)-जुना जालना भागातील संस्कार प्रबोधिनी शाळेतील पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवार हा दिवस एक खास, संस्मरणीयआणि भक्तिरसाने भरलेला ठरला. शाळेच्या वतीने जालना शहराचे आराध्य दैवतअसलेले श्री. आनंदी स्वामी मंदिरात पारंपरिक दिंडी सोहळा नेण्यात आला.पारंपरिक पोशाखात सजलेल्या चिमुकल्या वारकर्‍यांनी टाळ, मृदंग,पावल्यांच्या तालात भक्तिभावाने पुढे वाटचाल केली. वातावरण भक्तीमय आणि मंगलमय झाले होते.दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी पारंपरिक पावली, फुगड्या, विविध प्रकारचीपालखी सजावट, लाठी-काठीचे आकर्षक प्रात्यक्षिक मुळे वातावरण भारावून गेले. मंदिराच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी मनोभावे सादर केलेल्याअभंगगायनाने तर सर्वांचेच अंत:करण पुलकित झाले. या उपक्रमामागे विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव जागवणे, आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे,तसेच लोककलांविषयी आत्मीयता निर्माण करणे हा प्रमुख उद्देश होता. आणि तो विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने साकारला. या सुंदर दिंडी सोहळ्याचे आयोजन आणि मार्गदर्शन वर्ग पाचवी व सहावीचे शिक्षकवृंद अनितारावस, कैलास शिंदे, भागवत मराठे, प्रशांत बोधक, सुवर्णा पाठक, तसेचशिवनंदा बोबडे या सर्वांनी केले होते. शाळेच्या इतिहासात अशी दिंडी हीकेवळ एक परंपरा नसून विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली गेलेली एक संस्कारमयआणि आनंददायी आठवण बनून राहिली.००००००

फोटो ओळी…..७- जुना जालना भागातील संस्कार प्रबोधिनी शाळेतील पाचवी व सहावीच्याविद्यार्थ्यांनी शाळा ते श्री. आनंदी स्वामी मंदिरापर्यंत पारंपरिक दिंडीकाढण्यात आली होती. यावेळी शिक्षकांची उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

जिल्हा गंथोत्सवाचे थाटात उद्घाटन;सुजाण समाज घडविण्यासाठी ग्रंथ वाचनाची चळवळ व्हावी- पुरुषोत्तम भापकर

vishwatmaklokswamivarta

जिल्हा प्रशासनाचा अनोखा उपक्रम #‘ई-टपालवाला सेवा’जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हॉट्सअ‍ॅपवर नागरिकांना आता मिळणार जलद माहिती..

पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगारमेळाव्यातून ४७८ उमेदवारांची निवड

vishwatmaklokswamivarta

आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सायकलवर अधिका-यांसमवेत केला नवी मुंबई पाहणी दौरा

ग्रामीण भूमिहीन लाभार्थ्यांना प्राधान्याने घरकुलाचा लाभ द्यावा-ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे,मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत 72 हजार घरकुल पूर्ण…

vishwatmaklokswamivarta

देशाची राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणूकीच्या 70 जागांसाठी  मतदान सुरुवात सकाळी सात वाजल्या पासून सुरू झाले आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येईल

vishwatmaklokswamivarta