vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता 14 जुलैपासूनविद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियान 

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता 14 जुलैपासूनविद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियान

      सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता बार्टी, आर्टी, सारथी, महाज्योती व अमृत या संस्थांमार्फत दि. 14 ते 18 जुलै 2025 या कालावधीत विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यास स्वावलंबी बनविणे व प्रशासकीय सेवेमध्ये सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात येत आहे. या अभियानात विद्यार्थ्यांकरिता शासकीय संस्थांच्या योजना, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, अधिछात्रवृत्ती अशा अनेक योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच, अमली पदार्थ प्रतिबंध व पुनर्वसनाच्या अनुषंगाने सांगली व मिरज येथील तज्ज्ञ वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे. याचा सांगली जिल्ह्यातील महाविद्यालयात शेवटच्या वर्षामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी, प्राध्यापकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मेघराज भाते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

प्रथम टप्प्यात सांगली जिल्ह्यातील निवडक 50 महाविद्यालयात दररोज 10 कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. 9 समतादूत पूर्ण क्षमतेने या कार्यशाळेस उपस्थित राहणार आहेत. तसेच, संबंधित सर्व संस्थांचे सांगली जिल्ह्यातील प्रतिनिधी या कार्यशाळेस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

 

00000

संबंधित पोस्ट

आला उन्हाळा – प्रकृती जपणुकीसाठी आरोग्य विषयक नियम पाळा’ : नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

उद्योजकांना उद्योजकांकरीता वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळाच्या विविध कर्ज योजना…

दिल्लीतील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात प्राचीन युद्धकलेचा जागर!*_*मणिपुरी थांग-ता, शिवकालीन युद्धतंत्र व अफजलखान वधाचे थरारक सजीव प्रात्यक्षिक!*

vishwatmaklokswamivarta

मुंबई महापालिकेवर महायुती ची सत्ता आणण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*मुंबई महापालिकेवर महायुती ची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौर पद मिळेल*मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाची मोर्चेबांधणी…

vishwatmaklokswamivarta

मुंबईच्या ‘वेव्हज्’ परिषदेत नवकल्पनेसोबत तंत्रज्ञानाचा महासागर…

विशेष लेख -‘डिजिटल महाराष्ट्र’च्या स्वप्नाला अमरावतीचे बळ; ई-गव्हर्नन्स मानांकनात अमरावती महानगरपालिकेचा राज्यात पाचवा क्रमांक!