vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता 14 जुलैपासून विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियान 

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता 14 जुलैपासून विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियान

      सांगलसां प्रतिनिधी) : जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता बार्टी, आर्टी, सारथी, महाज्योती व अमृत या संस्थांमार्फत दि. 14 ते 18 जुलै 2025 या कालावधीत विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यास स्वावलंबी बनविणे व प्रशासकीय सेवेमध्ये सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात येत आहे. या अभियानात विद्यार्थ्यांकरिता शासकीय संस्थांच्या योजना, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, अधिछात्रवृत्ती अशा अनेक योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच, अमली पदार्थ प्रतिबंध व पुनर्वसनाच्या अनुषंगाने सांगली व मिरज येथील तज्ज्ञ वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे. याचा सांगली जिल्ह्यातील महाविद्यालयात शेवटच्या वर्षामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी, प्राध्यापकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मेघराज भाते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

     प्रथम टप्प्यात सांगली जिल्ह्यातील निवडक 50 महाविद्यालयात दररोज 10 कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. 9 समतादूत पूर्ण क्षमतेने या कार्यशाळेस उपस्थित राहणार आहेत. तसेच, संबंधित सर्व संस्थांचे सांगली जिल्ह्यातील प्रतिनिधी या कार्यशाळेस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

00000

संबंधित पोस्ट

आदर्श राज्याचा वस्तुपाठ छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्यवर्ती संग्रहालयात वाघनखे व शिवशस्त्र दालनाचे उदघाटन,विदर्भातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भेट देण्याचे आवाहन लेझीम, ढोल-ताशे, दिंडी पथकाच्या मिरवणुकीतून मुख्यमंत्र्यांचे स्वागत

vishwatmaklokswamivarta

क्षयरोग मुक्त ४२ ग्रामपंचायत सन्मानित जनजागृती, निदान व उपचार हीच क्षयरोग मुक्तीची त्रिसुत्री- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

सिद्धरमय्या मुख्यमंत्री, डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री, कर्नाटकमध्ये काँग्रेसचा आज भव्य शपथविधी सोहळा

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

श्रावण हिरवळ..कवितेचा दरवळ…’अंजनी फाऊंडेशनच्या वतीने जालना शहरात आज निमंत्रितांचे कविसंमेलन

जागतिक महिला दिन कार्यक्रम उत्साहात संपन्ननवीन सक्षम पिढी घडविण्याचे काम महिलांच्या हाती- खासदार डॉ.कल्याण काळे