vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता 14 जुलैपासून विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियान 

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता 14 जुलैपासून विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियान

      सांगलसां प्रतिनिधी) : जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता बार्टी, आर्टी, सारथी, महाज्योती व अमृत या संस्थांमार्फत दि. 14 ते 18 जुलै 2025 या कालावधीत विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यास स्वावलंबी बनविणे व प्रशासकीय सेवेमध्ये सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात येत आहे. या अभियानात विद्यार्थ्यांकरिता शासकीय संस्थांच्या योजना, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, अधिछात्रवृत्ती अशा अनेक योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच, अमली पदार्थ प्रतिबंध व पुनर्वसनाच्या अनुषंगाने सांगली व मिरज येथील तज्ज्ञ वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे. याचा सांगली जिल्ह्यातील महाविद्यालयात शेवटच्या वर्षामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी, प्राध्यापकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मेघराज भाते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

     प्रथम टप्प्यात सांगली जिल्ह्यातील निवडक 50 महाविद्यालयात दररोज 10 कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. 9 समतादूत पूर्ण क्षमतेने या कार्यशाळेस उपस्थित राहणार आहेत. तसेच, संबंधित सर्व संस्थांचे सांगली जिल्ह्यातील प्रतिनिधी या कार्यशाळेस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

00000

संबंधित पोस्ट

राजधानीत महात्मा जोतिराव फुले जयंती साजरी

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांना हाय सिक्युरीटी नंबर प्लेट बसविणे आवश्यक

vishwatmaklokswamivarta

पाच वर्षांच्या खंडानंतर कैलास मानसरोवर यात्रा आजपासून सुरु.

.उत्तर भारतात झालेल्या मोठ्या हिमवृष्टीमुळे आणि पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात आता कडाक्याच्या थंडीची चाहूल…

vishwatmaklokswamivarta

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांची कार्यवाही सुरळीत सुरु;अफवांवर विश्वास न ठेवण्याचे विजयसिंह देशमुख यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

भारताच्या राष्ट्रपती, श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 10व्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे उद्घाटन केले “आम्ही स्त्रीच्या डोळ्यातून एक अश्रू देखील पडू देऊ शकत नाही,” – गुरुदेव श्री श्री रविशंकर

vishwatmaklokswamivarta