vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

स्वप्नांना प्रत्यक्षात साकारण्यासाठी परिश्रमाची जोड आवश्यक – पालकमंत्री संजय राठोड रोजगार मेळाव्यात पालकमंत्र्यांचा युवकांशी संवाद

स्वप्नांना प्रत्यक्षात साकारण्यासाठी परिश्रमाची जोड आवश्यक – पालकमंत्री संजय राठोड रोजगार मेळाव्यात पालकमंत्र्यांचा युवकांशी संवाद..

यवतमाळ, प्रतिनिधी : आजचे युग हे कौशल्यावर चालते. त्यामुळे युवकांनी रोजगार स्वयंरोजगार मिळविण्यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात केले पाहिजे. प्रत्येकजन आपल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्वप्न पाहत असतात. असे स्वप्न पूर्ण होण्यासाठी युवकांनी परिश्रमाची जोड दिली पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने जाजू महाविद्यालयात पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे युवकांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास मंत्री प्रा.डाॅ.अशोक उईके, आ.बाळासाहेब मांगुळकर, प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, सहायक आयुक्त प.भ.जाधव, हरिकिसन जाजू एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जाजू, सचिव आशिष जाजू तसेच शिल्पा जाजू, प्राचार्य रितेश चांडक, प्रफुल चव्हाण उपस्थित होते.

सद्याच्या युगात शिक्षण घेवूनही अनेक तरुणांना रोजगार, नोकरी मिळत नाही. त्यामुळे शिक्षणासोबतच कौशल्य विकास देखील आवश्यक आहे. आजचे जग केवळ डिग्री, शिक्षणावर चालत नसून कौशल्य विकसित केल्यास अधिक चांगल्या संधी आपण मिळवू शकतो. या मेळाव्यात विविध कंपन्या थेट आपल्या दारात नोकऱ्या घेवून आल्या आहेत, संधी आपल्या दारातच आहे, असे पुढे बोलतांना पालकमंत्री संजय राठोड म्हणाले.छोट्यापासून सुरुवात करत मोठे ध्येय गाठा. शासनाने आपल्यासाठी अनेक योजना आणल्या असून यापैकीच एक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे. शासकीय, खाजगी कार्यालयामध्ये कामाची संधी मिळून विद्यावेतन देखील या योजनेतून दिले जाते. जे उमेदवार स्वयंरोजगार करू इच्छितात अशा युवकांना देखील शासन मदत करते. स्टार्टअपच्या माध्यमातून नवउद्योजकाना संधी दिली जाते. विविध कर्ज देणारी महामंडळे सुद्धा यासाठी काम करतात. त्यामुळेच स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी मेहनत करा, मोठे व्हा, असे पालकमंत्र्यांनी युवकांशी संवाद साधतांना सांगितले.

मेळाव्यामध्ये सहभागी १४ नामांकित कंपन्यांनी त्यांच्याकडील ४७० रिक्त पदाकरिता नोकरी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. कार्यक्रमाचे संचलन सिमा खिरोडकर यांनी केले. आभार कॉलेज ऑफ मनेजमेंट ॲण्ड कॉम्प्यूटर सायन्सच्यावतीने व्यक्त करण्यात आले.

00000

संबंधित पोस्ट

श्री गणेशा आरोग्याचा; उपक्रमात २० हजार जणांची आरोग्य तपासणी..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2024-25इ.8वी शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी प्रसिद्ध..

महाराष्ट्र राज्यात नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्याला केले संबोधित

vishwatmaklokswamivarta

आसाम, केरळम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावणार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाचे नऊ, ११, १६ व २५ वर्षे मुदतीचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta