vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

लाडकी बहिण योजनेच्या नावाखाली सायबर फसवणूक

लाडकी बहिण योजनेच्या नावाखाली सायबर फसवणूक…

राज्य प्रतिनिधी-राज्य शासनाच्या लाडकी बहिण योजनेच्या नावाने काही फसव्या वेबसाईट्स आणि बनावट अर्जाची दुवे सध्या सोशल मीडियावर वेगाने प्रसारित होत आहेत. या बनावट दुव्यांवर क्लिक केल्यास नागरिकांची महत्त्वाची वैयक्तिक माहिती जसे की आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, ओळखपत्रांचे तपशील आदी चोरी होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

या संदर्भात प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, शासनाच्या कोणत्याही अधिकृत संकेतस्थळावर पात्रतेची यादी, अर्ज करण्याचा थेट दुवा किंवा पात्र महिलांची नावे अशा स्वरूपाची माहिती अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा बनावट लिंकवर विश्वास ठेवू नये व त्यावर कोणतीही माहिती भरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाची योजना आहे. योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे. परंतु, ही योजना जनतेत लोकप्रिय होत असताना काही फसवे लोक बनावट वेबसाईट्स तयार करून नागरिकांची फसवणूक करत आहेत, ही गंभीर बाब आहे. यामुळे अनेक महिलांची फसवणूक होण्याची शक्यता वाढली आहे.

महिला व बालविकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, लाडकी बहिण योजनेबाबत अधिकृत माहिती केवळ शासनाच्या संकेतस्थळावरच मिळेल. सोशल मीडियावर फिरणाऱ्या बनावट अर्ज, व्हिडीओ किंवा संदेशांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती भरण्यापूर्वी ती माहिती अधिकृत आहे की नाही, याची खात्री करावी.

फसव्या लिंकवर माहिती भरल्यामुळे काही जणांची बँक खाती रिकामी होण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अधिक सजग राहणे आवश्यक आहे. कुणीही आपली वैयक्तिक माहिती अनोळखी संकेतस्थळांवर भरू नये. योजनेसंदर्भातील शंका असल्यास जिल्हा प्रशासन, महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत कार्यालयाशी थेट संपर्क साधावा.

संबंधित पोस्ट

तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर जागतिक महासत्तांना आवाहन…

अंकित राठोडने लॅब मास्टर चॅम्पयनशिपमध्ये स्पर्धत सर्वप्रथम क्रमांक पटकावला  १५ विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला

डाक सेवांमध्ये डिजिटल क्रांती; आय.टी. 2.0 अप्लिकेशनचे कार्यान्वयन सोमवारी(4 ऑगस्ट) जिल्ह्यातील डाक सेवा बंद

vishwatmaklokswamivarta

महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात– जिल्हाधिकारी किशन जावळे

हिमरु शाल निर्मितीच्या उद्योगाला गतवैभव प्राप्त करुन देणार- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी शिक्षण घेतलेल्या १८० पैकी ३६ महिलांचे उद्योग उभारणीसाठी पहिले पाऊल

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांंच्या जंगी सभेने वातावरणात बदल-जालना महानगर पालिका कुणी खाल्ली हे ते सांगत नाहीत-अर्जुनराव खोतकर!

vishwatmaklokswamivarta