vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

दिवा-मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमींना मंत्र्यांची भेट, तातडीच्या उपचाराचे निर्देश; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मृतांना श्रद्धांजली

दिवा-मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमींना मंत्र्यांची भेट, तातडीच्या उपचाराचे निर्देश; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मृतांना श्रद्धांजली

ठाणे, प्रतिनिधी- दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान झालेल्या रेल्वे प्रवासी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे जलसंपदा (तापी, विदर्भ आणि कोकण) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, डॉ.नरेश म्हस्के, आमदार रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे आणि राजेश मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची भेट घेवून विचारपूस केली. यावेळी त्यांनी ठाणे व कळवा येथील रुग्णालयांना जखमींवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश दिले. तसेच, या कठीण प्रसंगात शासन पूर्णपणे जखमी व त्यांच्या नातेवाईकांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली.

या हृदयद्रावक दुर्घटनेतील मृतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी मृतकांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचेही सांगितले.

या दुर्घटनेनंतर ठाणे जिल्हा प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे. प्रशासनाकडून बचावकार्य आणि जखमींना मदत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. ही घटना कशी घडली, याबाबत चौकशी सुरू असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

लातूर येथे आज 9 ऑगस्टपासून तीन दिवसीय लोकसंगीत महोत्सवाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते’आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेचे प्रकाशन

निवडणूक प्रचारावरील निर्बंधात बदल-मतदानाच्या आधीच्या दिवशी रात्री १० पासून प्रचारबंदी लागू

vishwatmaklokswamivarta

कुटुंबव्यवस्था सक्षम करण्यासाठी ‘स्वप्न तुझे माझे’उपक्रम प्रभावीपणे राबवा- श्रीमती विजया रहाटकर

अमेरिकेने लादलेल्या टॅरिफच्या आपत्तीला इष्टापत्तीत परावर्तित करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागतिक आयात निर्यात धोरणाच्या अनुषंगाने उपाययोजनांबाबत बैठक…

जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत आर्थिक समावेशन संपृक्तता मोहीम नागरिकांनी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे नागरिकांना आवाहन