vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अ‍ॅड. दीपक नाईक विशेष सरकारी वकीलपदी नियुक्त

अ‍ॅड. दीपक नाईक विशेष सरकारी वकीलपदी नियुक्त

जालना प्रतिनिधी: लातुर येथे ८ एप्रिल २०२५ रोजी ११.३६ किलो मेफेड्रोन (एमडी) हाअमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात राजस्व गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पुणे विभागाने सात जणांविरुध्द गुन्हा दाखल केलाअसून या खटल्यात फिर्यादी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून जालन्याचे अ‍ॅड. दीपक बलवंत नाईक यांची नेमणुक करण्यात आली आहे

ड्रग्ज व्यापारातील प्रमोद संजीव केंद्रे (३५), जुबेर हसन मापक (५२), अहदशफी मेमन,, मोहम्मद असलम खान, मोहम्मद कलीम शेख, मोहम्मद वसीम शेख (३३),दिलावर अल्ताफ खान (३४), अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात विशेषसरकारी वकील अ‍ॅड. दीपक बलवंत नाईक हे सर्व सुनावणीत फिर्यादी पक्षाच्यावतीने हजर राहुन खटल्याचा पाठपुरावा करतील, केंद्रीय अप्रत्यक्ष कर वसीमाशुल्क मंडळाच्या ८ जानेवारी २०२४ रोजीच्या पत्रानुसार त्यांच्या नेमणुकीच्या अटी लागू राहतील. प्रकरणात प्रगती झाल्यास संबंधीत कार्यालयास माहिती देणे, निकालाची प्रमाणित प्रत पुरवणे, आणि नियुक्तीसंपल्यानंतर सर्व कागदपत्रे परत करणे अशी जबाबदारी त्यांच्यावर आहे. या महत्वाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्तीबद्दल अ‍ॅड. दीपक नाईक यांचे अभिनंदन होत आहे.

संबंधित पोस्ट

महापारेषणला पॉवर ट्रान्समिशन पुरस्कार प्रदान अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गुलाबराव पाटील पालकमंत्र्यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

17वा रोजगार मेळावा: महाराष्ट्रातील 296 नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण भारतीय टपाल विभागाकडून मुंबई, पुणे, नागपूरमध्ये मेळाव्याचे यशस्वी आयोजन

vishwatmaklokswamivarta

महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी कठोर उपाययोजना;दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

एक दिवा सैनिकांसाठी – दिवाळी सकाळ सैनिकांच्या परिवारासोबत उपक्रम उत्साहात..

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाचा मोठा विजय!**वारकरी संप्रदायाची बदनामी करणारे ‘ईठ्ठला’ नाटक अखेर स्थगित;*मंत्री उदय सामंत यांची निर्मात्यांना कडक तंबी; नाव, पात्रे आणि संकल्पना बदलण्याचे आदेश..