vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

भाजपा जालना महानगर तर्फे गणेश मंडळाचे स्वागतआपल्या परंपरेचा वारसा पुढे नेण्याचे कार्य गणेश मंडळे करत आहेत, त्यांचा सन्मान म्हणजे आपल्या संस्कृतीचा गौरव आहे,” – भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

भाजपा जालना महानगर तर्फे गणेश मंडळाचे स्वागतआपल्या परंपरेचा वारसा पुढे नेण्याचे कार्य गणेश मंडळे करत आहेत, त्यांचा सन्मान म्हणजे आपल्या संस्कृतीचा गौरव आहे,” – भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

जालना, (प्रतिनिधी) भाजपा जालना महानगर तर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेश मंडळ स्वागत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील सर्व गणेश मंडळांचे पुष्पहार व श्रीफळ देऊन स्वागत करून मंडळांचा सन्मान करण्यात आला. शनिवार, दिनांक 06 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3.00 वाजता छत्रपती संभाजीराजे उद्यान (मोतीबाग), जालना येथे हा सोहळा पार पडला.

जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी सांगितले की, परंपरेचा वारसा पुढे नेण्याचे कार्य गणेश मंडळे करत आहेत. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून समाजातील ऐक्य, बंधुता आणि सामाजिक एकजुटीचे प्रतीक आहे. गणेश मंडळांच्या माध्यमातून तरुण पिढीमध्ये संस्कार, शिस्त व समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा निर्माण होत असते. त्यामुळे मंडळांचा सन्मान करणे म्हणजे आपल्या संस्कृतीचा गौरव करणे होय असे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, माजी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, प्रदेश निमंत्रित सदस्य, राजेश राऊत, मंडळ अध्यक्ष महेश निकम, धनराज काबलिये, ज्ञानेश्वर ढोबळे, शशिकांत घुगे, सुनील राठी, राजेंद्र भोसले, सिद्धिविनायक मुळे, वसंत शिंदे, सुनील पवार, शिवराज जाधव, संध्याताई देठे, वैशाली बनसोडे, पुष्पा मेहेत्रे, मनोज बिडकर, जगदीश येनगुपटला, राजू गवई, देविदास देशमुख, गोवर्धन कोल्हे, मनोज इंगळे, तुकाराम बखळे, कैलास उबाळे, सुदर्शन काळे, शाम उगले, निलेश गवळी, अनिल यशवंते, दौलत भुतेकर, आदींसह उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

ड्रोन प्रणालीचे उड्डाण व मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयातील-नियंत्रण कक्षाचे आज दि.09 जानेवारी रोजी होणार उद्घाटन

नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट १४ गावांमध्ये पाणीपुरवठा,रस्ते, आरोग्य सुविधा, शाळेच्या कामांना तातडीने प्राधान्य द्यावेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

दूरसंचार सल्लागार समितीची बैठक संपन्न – BSNL सेवांसंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय

प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान जिल्ह्यातील ११ गावांचा समावेश; १५ जून पासून जनजागृती

प्रत्येक ग्रामपंचायतीत उभारणार डिजीटल इंडिया सेवा केंद्र-केंद्र शासनाचा पथदर्शी प्रकल्प जिल्ह्यात कार्यान्वित…

vishwatmaklokswamivarta

चिखली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिव राज्यभिषेक दिन साजरा