मुंबई पोलिसांचे कौतुकास्पद पाऊल, चोरीला गेलेली आणि हरवलेली ८९.७९ लाख रुपये नागरिकांना परत करण्यात आले
मुंबई प्रतिनिधी-मुंबई पोलिस आयुक्त श्री. देवेन भारती यांच्या पुढाकाराने, परिमंडळ-७ (भांडुप, घाटकोपर, पंतनगर, विक्रोळी, पार्कसाईट, कांजूरमार्ग, मुलुंड आणि नवघर पोलिस स्टेशन) ने हरवलेली मालमत्ता जप्त करून नागरिकांना परत करण्यात आली.
हा सामूहिक कार्यक्रम २७ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी जनम हॉल, लाल बहादूर शास्त्री मार्ग, भांडुप (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आला होता.
पोलिसांनी तांत्रिक तपासणीनंतर चोरी, जबरी चोरी, घरफोडी, मोबाईल चोरी आणि इतर प्रकरणांमध्ये जप्त केलेली मालमत्ता परत केली
एकूण ८९,७९,५०८ (अठरा लाख उन्यासी हजार पाचशे आठ रुपये) किमतीचे सोने-चांदीचे दागिने, वाहने आणि मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले.कार्यक्रमात परिमंडल-७ चे डीसीपी श्री राकेश ओला यांनी ही मालमत्ता नागरिकांना सुपूर्द केली.
मालकांनी त्यांचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला माल परत मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि मुंबई पोलिसांचे आभार मानले.