vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दिवाळीत प्रवास महागणार – राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे तिकीट दरात वाढ

दिवाळीत प्रवास महागणार – राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे तिकीट  दरात वाढ

राज्य प्रतिनिधी-महाराष्ट्रराज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिवाळी हंगामासाठी तिकीट दरांमध्ये दहा टक्के हंगामी भाडेवाढ जाहीर केली आहे. ही वाढ दिनांक १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२५ या वीस दिवसांच्या कालावधीत लागू राहणार आहे. यामुळे एसटीच्या तिजोरीत अंदाजे एक हजार ते एक हजार शंभर कोटी रुपयांचा महसूल जमा होण्याची अपेक्षा आहे.

भाडेवाढीमुळे राज्यातील लांब पल्याच्या प्रवासात साधारणतः नव्वद ते शंभर रुपयांची वाढ होईल. उदाहरणार्थ, मुंबई-कोल्हापूर मार्गावरील तिकीट सहाशे चाळीस रुपयांवरून सातशे रुपयांपर्यंत वाढेल. मुंबई-मालवण मार्गावरील शिवशाहीची तिकीट एक हजार तीनशे रुपयांवरून एक हजार चारशे रुपयांपर्यंत वाढेल. मुंबई-जळगाव मार्गावरील स्लीपरची तिकीट एक हजार शंभर रुपयांवरून एक हजार दोनशे पन्नास रुपयांपर्यंत वाढेल.दिवाळीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढते, त्यामुळे एसटी महामंडळाने दिनांक १५ ऑक्टोबरपासून वाढीव बसगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाढीव बसगाड्या दिनांक ५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहतील. त्यानुसार, साधी, विठाई, शिवशाही, निमआराम या बससेवांसाठी भाडेवाढ लागू होईल. तथापि, मुंबई-पुणे मार्गावरील शिवनेरी बससेवांसाठी भाडेवाढ लागू होणार नाही.

एसटी महामंडळाने दरवर्षी दिवाळी आणि उन्हाळी हंगामात गर्दीच्या काळात उत्पन्न वाढीसाठी हंगामी भाडेवाढ केली आहे. गर्दीच्या हंगामात भाडेवाढ करण्याची एसटी महामंडळाला परवानगी आहे, आणि त्यानुसार ही तात्पुरती भाडेवाढ केली जाते.

संबंधित पोस्ट

महाज्योती संस्थेमार्फत पाच जिल्ह्यांमध्ये उत्कृष्टता केंद्र सुरू करण्यात येणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

काढणीपश्चात प्रक्रिया युनिट घटकाचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावेत

सार्वजनिक ग्रंथालयांनी पुरस्कारासाठी अर्ज करावेत

राज्यभर १ ते ३१ जानेवारी दरम्यान ‘रस्ता सुरक्षा अभियान’ केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आयोजन; ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ ही संकल्पना

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक *२७ वर्षे खटला प्रलंबित राहिल्याने न्यायालयात आत्महत्या: ५ कोटी खटले, ३२४ वर्षांची प्रतीक्षा**‘तारीख पे तारीख’ कधीपर्यंत; नामदेव जाधवांना न्याय कधी मिळणार ? – श्री. अभय वर्तक, सनातन संस्था

vishwatmaklokswamivarta

पेंच अभयारण्यातील न्यू तोतलाडोह गावातील पुनर्वसनामुळे विस्थापित झालेल्या लोकांना नियमाप्रमाणे सर्व सुविधा देण्यात याव्यात, अशा सूचना मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

vishwatmaklokswamivarta