vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडून फुलंब्री धरण परिसरातील  नुकसानग्रस्त भागाची पाहणी मच्छीमार बांधवांशी साधला संवाद..

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडून फुलंब्री धरण परिसरातील  नुकसानग्रस्त भागाची पाहणी मच्छीमार बांधवांशी साधला संवाद..

मुंबई, प्रतिनिधी : मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री धरण परिसरातील मच्छीमारांच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या पाहणीत मंत्री राणे यांनी मच्छीमार बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या आणि तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

पाहणी दरम्यान, नुकसानग्रस्त मच्छीमारांच्या समस्या समजून घेतल्या गेल्या आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आवश्यक प्रशासनिक पावले, मदत आणि साहाय्य यावर चर्चा करण्यात आली. मंत्री राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा तातडीने, अचूक व पारदर्शक पद्धतीने करण्याच्या ठोस सूचना दिल्या, जेणेकरून नुकसानाचे अचूक दस्ताऐवजीकरण होईल आणि त्यानंतर योग्य आर्थिक व प्रशासनिक मदत पोहोचवता येईल.या पाहणीदरम्यान स्थानिक आमदार अनुराधा चव्हाण, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, तसेच इतर संबंधित शासकीय अधिकारी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी नुकसानग्रस्त मच्छीमारांच्या अडचणींवर चर्चा केली आणि तातडीच्या मदतीसाठी प्रशासनाची तत्परता यावर भर दिला.0

000

संबंधित पोस्ट

जम्मू-काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेले जिल्ह्यातील नागरिक सुरक्षित…

वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेच्या वापरासाठी समिती स्थापन करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक

देवशयनी आषाढी एकादशीच्या पावन दिनानिमित्त पुणे शहरातील निवडुंग्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत महापूजा, काकड आरती आणि महाप्रसादाचे वाटप

vishwatmaklokswamivarta

अखिल भारतीय साहित्य संमेलनात मुंबई मराठी पत्रकार संघाचा स्टॉल पुस्तकाचे प्रदर्शन…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील 10 नगरपरिषद, 2 नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूर जिल्ह्यात ऊसाचा दर जाहीर न झाल्यामुळे   शेतकरी संघटनांनी ऊस वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय केल्याने वाहतूक ठप्प…

vishwatmaklokswamivarta