vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जम्मू-काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेले जिल्ह्यातील नागरिक सुरक्षित…

जम्मू-काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेले जिल्ह्यातील नागरिक सुरक्षित…

        सांगली, प्रतिनिधी : जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे दि. 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ला झाला. सांगली जिल्ह्यातील 30 पर्यटक काश्मीर येथे अडकले असल्याची प्राथमिक माहिती दि. 24 एप्रिल 2025 रोजीचे सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्हा नियंत्रण कक्षास प्राप्त झाली आहे. या पर्यटकांशी संपर्क झालेला असून सर्व 30 पर्यटक सुरक्षित असल्याबाबत कळविण्यात आले असल्याची माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

     या पर्यटकामध्ये सांगली शहरातील 10, कडेगाव 5, पलूस 8, मिरज 7 असे एकूण 30 नागरिक आहेत. यामध्ये सांगली शहरातील प्रतापसिंह राजपूत, ज्योती राजपूत, संतोष जगदाळे, वर्षा जगदाळे, अन्नपूर्णा भोसले, निशांद भोसले, रितेश जाधव, मनीषा जाधव, अलका जाधव व रिया जाधव, कडेगाव तालुक्यातील येडे येथील रामदास बाबर, सुर्यकांत कदम, दिपक अभंग, आप्पाजी सरगर व रामचंद्र जाधव, पलूस तालुक्यातील कुंडल येथील अविनाश लाड, शोभा लाड, वैभव लाड, संगीता लाड, विकास लाड, दिपाली विकास लाड, नितीन लाड व दिपाली नितीन लाड, मिरज शहरातील प्रमोद जगताप, वंदना जगताप, स्वरांजली जगताप, प्रांजली जगताप, विराज जगताप, फुलचंद शिंदे व हेमलता शिंदे यांचा समावेश आहे.

00000

संबंधित पोस्ट

अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी 18 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम पोलीस दलाने करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित ‘तरंग-२०२५’ कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टीबी फोरम समन्वय समितीची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेतनवाढीचा फरक देण्यासाठी महामंडळाला दरमहा ६५ कोटी रुपये, पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रीम म्हणून १२ हजार ५०० रुपये देण्याचा निर्णय

vishwatmaklokswamivarta

रिझर्व्ह बॅंक भारताच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ;डिजीटल व्यवहारांत देशाला जागतिक नेतृत्व मिळवून देण्यातआरबीआयचा महत्वाचा वाटा- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू..

vishwatmaklokswamivarta

नवीन पूल बाबूपेठवासियांसाठी चंद्रपूरशी मने जोडणारा दुवा ठरेलआमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी उड्डाणपुलाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव…