vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी 18 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी 18 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

        सांगली, प्रतिनिधी: एकात्मिक बाल विकास सेवा योजना सांगली ग्रामीण प्रकल्पांतर्गत रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका पाच व अंगणवाडी मदतनीसच्या एका पदासाठी पात्र महिला उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिनांक 18 जून 2025 पर्यंत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सांगली ग्रामीण या कार्यालयात कार्यालयीन वेळेत साक्षांकित प्रतीसह समक्ष पोहोच करावयाचे आहेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे बाल विकास प्रकल्प अधिकारी सांगली ग्रामीण यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

  अंगणवाडी सेविका रिक्त पद असलेल्या अंगणवाडी केंद्राचे नाव व क्रमांक व रिक्त पद संख्या पुढीलप्रमाणे. बुधगाव 46 – 01 पद, समडोळी 20 – 01 पद, दुधगाव 64, 67 – 02 पदे, सांबरवाडी 122 – 01 पद आणि काकडवाडी 106 या अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी मदतनीसचे एक पद रिक्त आहे.

  अटी व शर्ती – उमेदवाराचे वय दिनांक 18 जून 2025 रोजी वय वर्षे 18 वर्षाचे वरील व 35 वर्षाच्या आतील असावे. विधवा महिला उमेदवारासाठी वयोमर्यादा दिनांक 18 जून 2025 रोजी 18 वर्षे पूर्ण व 40 वर्षाच्या आतील राहील. अंगणवाडी सेविका / मदतनिस पदासाठी शैक्षणिक पात्रता किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. महिला उमेदवार ही त्या गावची स्थानिक रहिवासी असावी. उमेदवाराने फक्त स्थानिक गावातीलच अंगणवाडी सेविका / मदतनीस पदासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. या पदासाठी लहान कुटुंबाची अट लागू राहील, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

0000

संबंधित पोस्ट

संविधान गौरव संमेलन-लोकांच्या मनामनात रुजवावे संविधान- पालकमंत्री संजय शिरसाट

जलयुक्त शिवार २.० आढावा बैठकजलसंधारणाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा-जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

सहकार पुरस्कारासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ; सहकारी संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन

गायमुख ते फाउंटन रस्ता वाढविण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीचे पैसे जमा होणार ; राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय ! सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना, 36 हजार 500 कोटी रुपयांचे वितरण..

vishwatmaklokswamivarta