vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !तरुण पिढीला उद्ध्वस्त करणाऱ्या ‘सनबर्न’ संस्कृतीला लगाम लावून तातडीने ‘ड्रग्जमुक्त महाराष्ट्र’ अभियान राबवा!

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !तरुण पिढीला उद्ध्वस्त करणाऱ्या ‘सनबर्न’ संस्कृतीला लगाम लावून तातडीने ‘ड्रग्जमुक्त महाराष्ट्र’ अभियान राबवा!

 

     मुंबई प्रतिनिधी- गोरेगाव येथील म्युझिक कॉन्सर्टमध्ये दोन तरुणांचा झालेला मृत्यू आणि राज्यात फोफावलेला अमली पदार्थांचा व्यापार, हे महाराष्ट्र ‘उडता पंजाब’ होण्याच्या दिशेने चालल्याचे लक्षण आहे. त्यामुळे सरकारने आता वेळ न घालवता तातडीने ‘ड्रग्जमुक्त महाराष्ट्र’ अभियान राबवावे; तसेच ‘सनबर्न’, म्युझिक कॉन्सर्ट, रेव्हा पार्ट्या आदी भारतीय संस्कृतीविरोधी कार्यक्रमांमुळे तरुण पिढीचे जीवन उद्ध्वस्त होत असल्याने, याला जबाबदार असणारे आयोजक तथा प्रशासकीय यंत्रणा यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. समितीने यापूर्वीही मुंबई आणि गोवा येथील ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला तीव्र विरोध केला होता, कारण अशा कार्यक्रमांतून मिळणाऱ्या महसुलापेक्षा होणारी सामाजिक आणि राष्ट्रीय हानी अधिक गंभीर आहे.

  अंमली पदार्थांचे हे पसरलेले जाळे केवळ व्यसनाधीनतेपुरते मर्यादित नसून देशाला पोखरण्याचे एक मोठे युद्धच आहे. ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’च्या आकडेवारीनुसार, वर्ष २०२५ मध्ये २००० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त होणे आणि नाशिक, मुंबई-साताऱ्यासारख्या शहरांत ड्रग्जचे कारखाने सापडणे, हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर आव्हान आहे. भारत हा ‘गोल्डन क्रेसेंट’ आणि ‘गोल्डन ट्रँगल’च्या मध्यभागी असल्याने तस्करांकडून देशाचा वापर ‘ट्रान्झिट रूट’ म्हणून केला जात आहे. तरी सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन केवळ तस्करांच्याच नव्हे, तर अशा पार्ट्यांचे आयोजन करणाऱ्या आयोजकांच्या मुसक्या आवळून तरुण पिढीला या विळख्यातून वाचवावे, असे आवाहन समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.श्री. सुनील घनवट,राज्य संघटक, महाराष्ट्र व छत्तीसगड हिंदु जनजागृती समिती, (संपर्क : ७०२०३८३२६४)

संबंधित पोस्ट

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे जिल्ह्यातील मावळ व खेड परिसरात ‘शुभ आरंभ’ उपक्रमातून उल्लेखनीय परिवर्तन…

vishwatmaklokswamivarta

अवयवदानाचा सांगली पॅटर्न तयार करावा- जिल्हाधिकारी अशोक काकडे- ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ची भावना नागरिकांत रूजविण्याचे आवाहन- अवयवदानासाठी क्यू आर कोड सुविधेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे अनावरण…

उझबेकिस्तानच्या दौऱ्यात पंतप्रधानांची उझबेकिस्तानच्या अध्यक्षांशी औपचारिक चर्चा

बिहार मध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार असो महाबोधी महाविहार प्रश्नी बौद्धांना न्याय मिळालाच पाहिजे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*बौद्ध आंबेडकरी जनतेचे आझाद मैदानात रखरखत्या उन्हात विराट शक्तिप्रदर्शन*

vishwatmaklokswamivarta

शेतरस्त्यांची उपलब्धता ही ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारी – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा

राष्ट्रीय ई-शासन पुरस्कारांमध्ये नंदुरबार, पुणे आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड