vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

टपाल विभागात ‘डाक जीवन विमा’ प्रतिनिधींची भरती; 20 जानेवारीला मुलाखती

टपाल विभागात ‘डाक जीवन विमा’ प्रतिनिधींची भरती; 20 जानेवारीला मुलाखती

    अमरावती, प्रतिनिधी: भारतीय डाक विभागाच्या अमरावती विभागांतर्गत डाक जीवन विमा विना मध्यस्थी नेमणूक करण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रवर अधीक्षक डाकघर, अमरावती विभाग यांनी केले आहे.

    या भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 ते 50 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असून, किमान शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण (किंवा समतुल्य) असणे अनिवार्य आहे. उमेदवारांची निवड ही मुलाखतीतील कामगिरी, संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व आणि विमा क्षेत्रातील प्राथमिक ज्ञानावर आधारित केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना ५ हजार रुपयांची सुरक्षा अनामत रक्कम (NSC किंवा KVP स्वरूपात) जमा करावी लागेल. प्रशिक्षणांनंतर उमेदवारांना सुरुवातीला तात्पुरता परवाना दिला जाईल. मात्र, नियुक्तीच्या तीन वर्षांच्या आत आयआरडीएची परवाना परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे, त्यानंतरच हा परवाना कायमस्वरूपी केला जाईल.

    ही नियुक्ती पूर्णपणे कमिशन तत्त्वावर असेल. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी आपले मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट आकाराचे फोटो घेऊन प्रवर अधीक्षक कार्यालय, कॅम्प, अमरावती – 444620 येथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे. निवड प्रक्रियेबाबतचे अंतिम अधिकार भारतीय डाक विभागाने स्वतःकडे राखून ठेवले आहेत.

 

00000

संबंधित पोस्ट

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवानिमित्त…गोव्यात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे भव्य आयोजन!संत-महंत, मंत्री यांच्यासह २० हजारांहून अधिक साधक-धर्मनिष्ठ उपस्थित रहाणार!

शेख मोहसीनोद्दीन यांची काँग्रेसच्या शहर सचिव पदी नियुक्ती 

vishwatmaklokswamivarta

श्रावण महिना आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरुळ  भाविकांना उत्तम सुविधा देण्यास कटीबद्ध – जिल्हाधिकारी दिलीप स्वामीश्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर घृष्णेश्वर मंदिर परिसरात सुविधांचा आढावा..

राष्ट्रीय स्टार्टअप दिन २०२६ : स्टार्टअप रँकिंगमध्ये ‘लीडर्स’ श्रेणीत महाराष्ट्राचा सन्मान

vishwatmaklokswamivarta

जाहिर प्रकटन-*विस्तारित बांबवडे उपसा सिंचन योजनेच्या दोन टप्प्यांतून ११केव्ही विद्युत वाहिनी सुरू होत असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी*

भारताच्या डिजिटल कौशल्य मोहिमेला गती देण्यासाठी “बढना है तो यहाँ जुडना है” या देशव्यापी मोहिमेचा, केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी ‘एस आय डी एच’ या कौशल्य भारत डिजिटल केंद्राच्या माध्यमातून केला शुभारंभ