vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मप्रदेश

उमाळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

उमाळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

बुलढाणा, (प्रतिनिधी)

तालुक्यातील उमाळा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील १६ ते २३ जानेवारी कालावधीमध्ये श्री शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा तथा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या‌ यामध्ये दररोज पहाटे ४ ते ६ काकडा, ७ ते ८ विष्णू सहस्त्र नाम, ८ ते ९ गीता पारायन, १० ते ११ गाथा भजन, दुपारी १ ते ४ भागवत कथा, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ८.३० ते १०.३० हरीकीर्तन, असे दैनंदिन कार्यक्रम असणार आहे. विठ्ठल रूखमिणी मंदिर उमाळा येथे कथाकार भागवताचार्य ह.भ.प. दिनेश महाराज बोडखे, वैजापूर यांच्या रसाळ वाणीतून भाविकांना श्री शिव महापुराण कथेचे श्रवण करता येणार आहे. यादरम्यान १६ जानेवारी रोजी हभप गोपाल महाराज भुसारी, १७ जानेवारी हभप रेणुकाताई महाराज जाधव, १८ जानेवारी हभप क्रांतीताई महाराज, १९ जानेवारी हभप शुभम महाराज गोरे, २० जानेवारी हभप विकास महाराज जाधव, २१ जानेवारी हभप ज्ञानेश्वर माऊली भवर, २२ जानेवारी हभप गणेश महाराज मगर, वेदशास्त्र संपन्न बाजीराव स्वामी वारकरी शिक्षण संस्था, गारज यांच्या हरीकीर्तनांचा लाभ भाविकांना घेता येणार आहे. गायनाचार्य हभप रिंकेश महाराज, हभप वाल्मिक महाराज, हभप अरुण महाराज, हभप सागर महाराज, हभप प्रशांत महाराज, मृदुंगाचार्य योगेश महाराज यांचा समावेश असणार आहे. तर हभप संदिप महाराज सांगळे यांचे २३ जानेवारीला काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर दुपारी १ ते ४ या वेळेत महाप्रसादाचे वाटप होईल. पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उमाळा वासियांच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ एकाच छताखाली लाभ; शिबिराचे आयोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जिल्ह्यात २८ शहीद स्मारके उभारणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील शूरवीराच्या शौर्याचा गौरव: पालकमंत्र्यांच्या हस्ते शहीद जवान सुनील पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

संतानी पर्यावरणपूरक जीवनाचा संदेश दिला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ उपक्रमाचा समारोप

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचे कर्ज प्रस्ताव महादिशा पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने सादर करावेत…

vishwatmaklokswamivarta

वरंध घाट 30 सप्टेंबर पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना..

vishwatmaklokswamivarta

संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सज्ज उपलब्ध पाण्याचे नियोजन व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,· जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवनावर भर द्यावा· पाणी बचतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक स्तरावर टास्क फोर्स स्थापन करावे· वैरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवा· खत पुरवठा व वितरणावर एआयच्या माध्यमातून लक्ष ठेवा