त्र्यंबकेश्वर-गिरीजानंद महाराज यांची धर्मप्रसारासाठी पायी यात्रा…
जालना ( प्रतिनिधी) त्र्यंबकेश्वर येथील स्वामी गिरिजानंद महाराज सरस्वती त्रंबकेश्वर येथून बारा ज्योतिर्लिंग दर्शनासाठी पायी निघाले असून ते पुढील वर्षी नाशिक कुंभमेळा पूर्वी निसर्गप्रेम, सामाजिक सदभावना व धर्मजागृतीचे काम करत आहेत
काल सोमवारी सकाळी स्वामी गिरीजानंद महाराज सरस्वती, श्री आनंद आखाडा पंचायती, त्र्यंबकेश्वर यांनी औंढा नागनाथ येथील मंदिराकडे पायी निघण्यापूर्वी जालना शहरातील शितल आबड यांच्या मंठा रोडवर असलेल्या गार्डनमध्ये मुक्काम केला . यावेळी त्यांनी शहरातील विविध भाविकांना हिंदू धर्माविषयी माहिती देऊन कुंभमेळ्याचे महत्त्व सांगितले. शहरातील भक्त गोवर्धन अग्रवाल, विजय कामड, अशोक आबाड,डॉ शुक्ला, शीतल आबड, रवी अग्रवाल यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतले तसेच आमदार अर्जुनराव खोतकर व माजी मंत्री राजेश टोपे, उपमहापौर राजेश राऊत यांनाही आशीर्वाद दिले. स्वामी गिरीजानंद महाराज यांच्या सोबत रोहितानंद, विश्वेश्वरानंद मुक्तानंद भीमाशंकर गिरी युवराज आनंद महाराज आहेत.