vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मप्रदेश

ज्यांच्याकडे कन्यारत्न आहे त्याला कशाही कमी नाही-राहुल महाराज जोशीहभप प्रा. उध्दव महाराज वाघमारे यांचे आज हरिकिर्तन…

ज्यांच्याकडे कन्यारत्न आहे त्याला कशाही कमी नाही-राहुल महाराज जोशीहभप प्रा. उध्दव महाराज वाघमारे यांचे आज हरिकिर्तन…

जालना/प्रतिनिधी,ज्यांच्याकडे कन्यारत्न जन्माला आलेले आहे, त्याला कशाही कमी भासत नाही. म्हणतात ना पहिली बेटी और धन की पेटी… असा हितोपदेश हभप राहुल महाराज जोशी यांनी येथे बोलतांना दिला.

श्री. जोशी महाराज सहकार बँक कॉलनीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या भागवत कथेचे पाचवे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, पहिली बेटी ही खरोखरच धन की पेटी असते. मुलगी जन्माला आली की आपण बँक बँलन्स वाढवायला सुरुवात करतो. म्हणूनच म्हटले की, पहिली बेटी और धन की पेटी! श्रीकृष्ण जन्माचे गोडवे आज श्री. जोशी महाराजांनी गायिले. यावेळी त्यांनी पाळणा आणि भजनं देखील गायिले.

कीर्तन सेवेत आज हभप श्री राजेंद्र महाराज वाघमारे गोंदीकर यांनी जग्तगुरु संत तुकाराम महाराजांच्या अंभगावर निरुपन केले. भक्ती ते नमन । वैराग्य तो त्याग॥ ब्रम्ही भोग, ब्रम्हा तनु, देहाचे निरासने पाहिजे या ंठाया, माझी ऐसी काया॥ या अभंगावर निरुपन करतांना ते म्हणाले की, साधक भक्ती करतो, त्याच्या सेवेसाठी आहे म्हणून! भक्ती म्हणजे नमन! अर्थात भक्ती ही नम्रता आहे म्हणून ती सर्वश्रेष्ठ मानली आहे. संतांची दृष्टी सुध्दा अशीच होती. नम्रता हा भाव प्रत्येकांच्या ठायी- ठायी असावा, असेही ते म्हणाले.

यावेळी विश्वस्त मंडळचे सचिव श्री संपतराव पाटील, मंडळाचे इतर पदाधिकारी व कॉलनी सर्व भाविक उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

जीबीएस’ आजाराचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज नागरिकांनी घाबरून जावू नये –

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या स्वागतासाठी नांदेड नगरी सज्ज ; जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण ; कार्यक्रमासाठी प्रवेश पासची आवश्यकता नाही

vishwatmaklokswamivarta

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षणउच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण..

पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील धोत्रानाईक, वरवंड व धानोरी गावासाठी टँकर मंजूर

नववर्ष प्रण-सुरक्षित अन्न’ मोहिमेचा समारोप;दर्जेदार रेस्टॉरंट्सचा जिल्हाधिकारी  आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव

निसर्गाचे जतन आणि संवर्धनाच्या साक्षरतेसाठी बायो-डायव्हर्सिटी पार्क आवश्यक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस