vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मप्रदेश

ज्यांच्याकडे कन्यारत्न आहे त्याला कशाही कमी नाही-राहुल महाराज जोशीहभप प्रा. उध्दव महाराज वाघमारे यांचे आज हरिकिर्तन…

ज्यांच्याकडे कन्यारत्न आहे त्याला कशाही कमी नाही-राहुल महाराज जोशीहभप प्रा. उध्दव महाराज वाघमारे यांचे आज हरिकिर्तन…

जालना/प्रतिनिधी,ज्यांच्याकडे कन्यारत्न जन्माला आलेले आहे, त्याला कशाही कमी भासत नाही. म्हणतात ना पहिली बेटी और धन की पेटी… असा हितोपदेश हभप राहुल महाराज जोशी यांनी येथे बोलतांना दिला.

श्री. जोशी महाराज सहकार बँक कॉलनीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या भागवत कथेचे पाचवे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, पहिली बेटी ही खरोखरच धन की पेटी असते. मुलगी जन्माला आली की आपण बँक बँलन्स वाढवायला सुरुवात करतो. म्हणूनच म्हटले की, पहिली बेटी और धन की पेटी! श्रीकृष्ण जन्माचे गोडवे आज श्री. जोशी महाराजांनी गायिले. यावेळी त्यांनी पाळणा आणि भजनं देखील गायिले.

कीर्तन सेवेत आज हभप श्री राजेंद्र महाराज वाघमारे गोंदीकर यांनी जग्तगुरु संत तुकाराम महाराजांच्या अंभगावर निरुपन केले. भक्ती ते नमन । वैराग्य तो त्याग॥ ब्रम्ही भोग, ब्रम्हा तनु, देहाचे निरासने पाहिजे या ंठाया, माझी ऐसी काया॥ या अभंगावर निरुपन करतांना ते म्हणाले की, साधक भक्ती करतो, त्याच्या सेवेसाठी आहे म्हणून! भक्ती म्हणजे नमन! अर्थात भक्ती ही नम्रता आहे म्हणून ती सर्वश्रेष्ठ मानली आहे. संतांची दृष्टी सुध्दा अशीच होती. नम्रता हा भाव प्रत्येकांच्या ठायी- ठायी असावा, असेही ते म्हणाले.

यावेळी विश्वस्त मंडळचे सचिव श्री संपतराव पाटील, मंडळाचे इतर पदाधिकारी व कॉलनी सर्व भाविक उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

चिखलदरा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 142 उमेदवारांची प्राथमिक निवडआदिवासी तरुणांनी जागतिक स्तरावर झेप घेण्याचे आमदार केवल कुमार काळे यांचे आवाहन

प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराजांचे ज्ञानसाहित्य जतन व्हावे- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

vishwatmaklokswamivarta

संभाव्य पूरस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- सांगलीत कृष्णाकाठी आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम संपन्न

महाराष्ट्रात होणार राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा मंत्री लोढा यांच्या उपस्थितीत गांधीनगरमध्ये इंडिया स्किल स्पर्धेचे उद्घाटन

गोल्डमन सॅक्सच्या नव्या मुंबई कार्यालयाचे  मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन,तिसरी मुंबई आर्थिक विकासाचा नवा अध्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘चांदा ज्योती सुपर १००’ अभ्यासिकेचे उद्घाटन; जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम