vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महिला शेतकरी गटांना कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी अर्ज करण्यास 25 एप्रिलपर्यत मुदतवाढ

महिला शेतकरी गटांना कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी अर्ज करण्यास 25 एप्रिलपर्यत मुदतवाढ

नांदेड द प्रतिनिधी :- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2.0 पोकरा अंतर्गत गावांमध्ये गावस्तरीय कृषी अवजारे बँक हा घटक राबविण्यात येत आहे. याचा मुख्य उद्देश अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना कृषी अवजारांच्या उच्च किंमतीमुळे उद्भवणाऱ्या समस्येवर मात करण्यासाठी व यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून कृषि उर्जेचा वापर वाढविणे हा आहे. या अंतर्गत गावांतील महिला शेतकरी गटांना कृषी यांत्रिकीकरणासाठी आवश्यक कृषी अवजारे उपलब्ध करुन देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. परंतु आता अर्ज 25 एप्रिल 2026 ही अंतिम मुदतवाढ दिली आहे.

पात्रता निकष :प्रकल्प गावातील एमएसआरएलएम/माविम पुरस्कृत महिला बचतगट व गाव संघ पात्र राहतील. अर्जदार गटात वेगवेगळया कुटूंबातील किमान 10 सदस्य असणे आवश्यक. ज गटांना यापूर्वी कोणत्याही योजनेतून कृषी अवजारे बँकेसाठी लाभ मिळाला आहे, ते गट अपात्र राहतील. एका गावातून एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास निवड प्रक्रीया ऑनलाइ्रन लॉटरी पध्दतीने केली जाईल.

लाभ,प्रकल्प मूल्यांच्या 60 टक्के पर्यत अनुदान (कमाल 24 लाख रुपये). प्रकल्प मूल्य 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास राष्ट्रीयकृत बँकेकडून प्रकल्प मूल्यांच्या 75 टक्के कर्ज घेणे बंधनकारक राहील. या योजनेसाठी अर्ज एफपीओ-डीबीटी पोर्टल https://dbtndksp.mahapocra.gov.in वरुन ऑनलाईन पध्दतीने करावयाचा आहे. अर्ज करण्यासाठी अंतिम तारखेस मुदतवाढ देण्यात आली असून, 25 एप्रिल 2026 करण्यात आलेली आहे. निवड झालेल्या गटांना गावस्तरावर कृषी अवजार बँक स्थापन करण्यासाठी विविध प्रकारची कृषी यंत्रसामग्री घेणे अपेक्षित आहे. यामध्ये प्रामुख्याने ट्रॅक्टरचलित औजारे, बीबीएफ यंत्र, रोपणी/लावणी यंत्र, मल्चिंग मशीन, कंबाईन हार्वेस्टर, फवारणी पंप, इत्यादी कृषी अवजारांचा समावेश आहे.

प्रकल्प क्षेत्रातील पात्र महिला शेतकरी गटांनी या योजनेचा लाघेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कराावेत असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा नांदेड यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी किंवा प्रकल्पाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

00000

संबंधित पोस्ट

जालन्यात 10 जानेवारी रोजी महा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन-संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मराठा आंदोलकांची मागणी…

03 फेब्रुवारी रोजी नवी मुंबई महापालिका लोकशाही दिन

vishwatmaklokswamivarta

महाकुंभात चेंगराचेंगरी : 10 जणांचा मृत्यू, अनेक जखमींची भीती,

vishwatmaklokswamivarta

धारावीतील पंचशिल गणेश मित्र मंडळाची सुवर्णमहोत्सवी यशस्वी वाटचाल “धारावीतील पंचाशिल गणेश मित्र मंडळाचा कार्यभार पहिल्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे!

vishwatmaklokswamivarta

उद्योग विभागाच्या MAITRI2.0 पोर्टलचे मंत्रिमंडळ बैठकीत अनावरणमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थितीउद्योग सुलभीकरण प्रक्रियेत पारदर्शकता, वेग वाढणार..

vishwatmaklokswamivarta

शेवटच्या घटकाचा विचार हाच खरा न्याय – न्यायमूर्ती अनिल किलोर बल्लारपूर येथे दिवाणी न्यायालय नूतन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन

vishwatmaklokswamivarta