जालन्यात 10 जानेवारी रोजी महा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन-संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मराठा आंदोलकांची मागणी…
राज्य प्रतिनिधी
जालना : जालन्यात 10 जानेवारी रोजी महा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मस्साजोग गावाचे मयत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. 10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता जालना शहरातील गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मराठा क्रांती मोर्चा आणि समविचारी संघटनांच्या वतीने हा महा जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चाच्या नियोजनाच्या अनुषंगाने आज जालन्यात मराठा आंदोलकांची बैठक पार पडली. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या आणि या प्रकरणाचा जलदगतीने तपास करा अशी मागणी यावेळी मराठा आंदोलकांनी केली. यावेळी सुनिल आर्दड,अरविंद देशमुख, देवकर्ण वाघ,विश्र्वंभर तिरुखे, संदिप ताडगे,पंकज जर्हाड,सुदाम मुकणे,बाळासाहेब इंगळे,बळीराम मोरे,नंदु दाभाडे,सुरेश ढवळे,गणेश कदम ,क्रूष्णा पडूळ,विष्णु कदम,सुरेश तळेकर,ऊद्धव पवार,शरद मांगधरे,गजानन काळै,मनौज ऊबाळे,मंगेश चव्हाण ,विक्रम गाढे, मंगेश देशमुख,प्रदिप गव्हाड,नामदेव धूमाळ,अनिरुद्द शेळके,योगेश पाटील,सतिश देशमुख,रवि ढगे,विष्णु घनघाव,प्रशांत वाढेकर यांच्यासह समाजबांधव उपस्िथत होते.