vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण पंधरवड्याचे आयोजन 

जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण पंधरवड्याचे आयोजन

 

जालना, प्रतिनिधी:- एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रस्तरावर दि. 9 एप्रिलपासून 8 वा राष्ट्रीय पोषण पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. बालकाचा शारीरिक विकासासोबतच मानसिक आणि बौद्धिक विकास व्हावा, यासाठी कुटुंब आणि समुदायामध्ये योग्य पद्धतींचा सराव व्हावा, हा या मोहिमेचा केंद्रबिंदू आहे. दि. 23 एप्रिल 2026 पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त पालकांनी आणि लाभार्थ्यांनी केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

यंदाचा पोषण पंधरवडा १). माता व बालकाचे पोषण: गरोदर माता आणि बालकांच्या आहाराबाबत मार्गदर्शन. २). मेंदू विकास (० ते ३ वर्षे): लहान मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी पूर्व उद्दीपन. ३). खेळातून शिक्षण (३ ते ६ वर्षे): मुलांसाठी खेळ आधारित पूर्व शालेय शिक्षण. ४). स्क्रीन टाइमवर नियंत्रण: मुलांचे मोबाईल व टीव्हीचे व्यसन कमी करण्यासाठी पालकांची भूमिका. ५). सक्षम अंगणवाडी: अंगणवाडी केंद्रांच्या सक्षमीकरणासाठी लोकसहभाग वाढवणे. या विषयावर प्रामुख्याने आधारित असेल. असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहिम राबविणार५ ते १५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांचे लसीकरण; २१ हजार ४५० डोस लस उपलब्ध.

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम — दि. १२ ऑक्टोबर २०२५“दोन थेंब आयुष्याचे – प्रत्येक बालकासाठी सुरक्षित भविष्याचे”..

उन्हाळ्यात उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मार्गदर्शक सुचना जारी..

स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान राबविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta

कुष्ठरुग्ण शोध मोहिमेमध्ये सातारा जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

समुदाय प्रतिसाद क्षमता बळकट करण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने भारतभरात सीपीआर जागरुकता सप्ताहाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta