vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अयोध्या नगर येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते महाआरती

अयोध्या नगर येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते महाआरती

जालना प्रतिनिधी शहरातील अयोध्या नगर येथे श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत महाआरती पार पडली. या प्रसंगी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी सपत्नीक उपस्थित राहून महाआरती केली व केंद्रातील सेवेकऱ्यांशी संवाद साधण्यात आला.कार्यक्रमादरम्यान सेवेकऱ्यांच्या निःस्वार्थ सेवाभावाचे आणि केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. श्री स्वामी समर्थ यांच्या विचारांचा समाजावर सकारात्मक प्रभाव पडत असून श्रद्धा, सेवा आणि एकतेची भावना अधिक बळकट होते.

महाआरतीनंतर त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या, केंद्राच्या माध्यमातून विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम प्रभावीपणे राबविले जात असून भविष्यातही हे कार्य अधिक व्यापक स्वरूपात सातत्याने सुरू ठेवावे, कार्यक्रमाच्या शेवटी श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि जालना शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रार्थना केली, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास केंद्रातील पदाधिकारी, सेवेकरी तसेच परिसरातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

आज पासून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव होणार ईश्वरपूर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे निवेदन

vishwatmaklokswamivarta

रासायनिक खताबाबत तक्रार नोंदविण्याचे आवाहन

ठाणे जिल्हा प्रशासनाचा संवेदनशील पुढाकार टंचाईग्रस्त 39 गावे आणि 127 पाड्यांसाठी तातडीने 40 टँकर तैनात, ग्रामीण भागाला मोठा दिलासा

माथेरानमधील अनधिकृत बांधकामांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती!

परभणी जिल्ह्याच्या विकासाला गती; विविध योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगीण बदल – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा चक्का जाम आंदोलनास प्रचंड प्रतिसाद सुमारे दीड तास वाहतुक कोलमडली : दुरदुरपर्यंत वाहनांच्या रांगा…