🌸 फुलांची होळी – पर्यावरणपूरक सण साजरा 🌸 मुंबईचे महापौर श्रीमती रितू तावडे
मुंबई प्रतिनिधी-‘फुलांची होळी’ हा पर्यावरणपूरक उपक्रम, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या पुढाकाराने घाटकोपर (पूर्व) स्थित राजावाडी उद्यान येथे आज संपन्न झाला.आमदार श्री. पराग शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागाने हा उपक्रम पार पडला.
रासायनिक रंगांचा वापर टाळून फुलांच्या पाकळ्यांनी धूलिवंदन करण्यात आले. वापरलेली फुले संकलित करून त्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती करण्यात येणार आहे. यामुळे स्वच्छ व हरित मुंबईच्या संकल्पनेला बळ मिळणार आहे.
सण आनंदात साजरे करताना पर्यावरणाचे संरक्षण करणे हे आपल्या सर्वांचे सामाजिक कर्तव्य आहे. ‘फुलांची होळी’ उपक्रमातून पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा कृतिशील संदेश देण्यात आला आहे.