vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

स्वाधार योजनेतील अर्जातील त्रुटी दुरुस्तीसाठी 4 मेपर्यंत मुदत..

स्वाधार योजनेतील अर्जातील त्रुटी दुरुस्तीसाठी 4 मेपर्यंत मुदत..

बुलढाणा प्रतिनिधी: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना” अंतर्गत शैक्षणिक सत्र 2025-26 साठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी 4 मे 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.

शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असूनही प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील इयत्ता 11 वी, 12 वी तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेद्वारे आर्थिक मदत दिली जाते. विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक खर्चासाठी आवश्यक रक्कम थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते.

या योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी शासनाने 26 डिसेंबर 2024 रोजीच्या निर्णयानुसार योजनेचा विस्तार तालुकास्तरावरही केला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी http://hmas.mahait.org या संकेतस्थळावर लॉगिन करून अर्जाची सद्यस्थिती तपासावी. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज Send Back झाले आहेत त्यांनी आवश्यक त्रुटी दुरुस्त करून 4 मे 2026 पूर्वी अर्ज पुन्हा ऑनलाईन सादर करावा. अर्ज फॉरवर्ड करण्यापूर्वी बँक खाते क्रमांक, IFSC कोड, खातेधारकाचे नाव यांसारखे तपशील अचूक भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरला आहे परंतु अर्जाची हार्डकॉपी व आवश्यक कागदपत्रे अद्याप कार्यालयात जमा केलेली नाहीत, त्यांनीही 4 मे 2026 पर्यंत ती सादर करावीत, असे समाजकल्याण सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी कळविले आहे.

0000

संबंधित पोस्ट

अद्यापही ऊसदर जाहीर न केलेल्या कारखान्यांनी त्वरित दर जाहीर करावा**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta

शेवटच्या घटकाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करावेत– आमदार संजय खोडके संपूर्णत: अभियानाचा सन्मान सोहळा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी,पात्र विद्यार्थ्यांना त्रुटी पुर्ततेसाठी अंतिम संधी

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख-हिंद दी चादर ; गुरु तेगबहादुर यांचे 350 वर्षांचे बलिदान पर्व…

vishwatmaklokswamivarta

उन्हाळी हंगामासाठी पाणी मागणीचे अर्ज २४ मार्चपर्यंत सादर करावेत

धर्माची शिकवण आणि आपत्तीत मदतीचा हात…!

vishwatmaklokswamivarta