vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

उन्हाळी हंगामासाठी पाणी मागणीचे अर्ज २४ मार्चपर्यंत सादर करावेत

उन्हाळी हंगामासाठी पाणी मागणीचे अर्ज २४ मार्चपर्यंत सादर करावेत

 

​अहिल्यानगर, प्रतिनिधी : नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील विविध धरणे व कालव्यांमधून उन्हाळी हंगाम सन २०२५-२६ साठी उभी हंगामी चारा पिके, ऊस व फळबागांसारख्या बारमाही पिकांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पाण्याचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभधारक शेतकऱ्यांनी व पाणी वापर संस्थांनी नमुना क्रमांक ७ वरील अर्ज संबंधित सिंचन शाखा कार्यालयात दि. २४ मार्च २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सो. अ. शहाणे यांनी केले आहे. निर्धारित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

हा पाणीपुरवठा गोदावरी उजवा व डावा तट कालवा, गंगापूर डावा तट कालवा, आळंदी उजवा व डावा तट कालवा तसेच पालखेड उजवा तट कालवा यांच्या लाभक्षेत्रात करण्यात येईल. याशिवाय दारणा, गंगापूर, मुकणे, भावली, वाकी, भाम, कडवा, वालदेवी, गौतमी-गोदावरी, काश्यपी व आळंदी आदी धरणांच्या जलाशयांवरून; तसेच दारणा, गोदावरी, कडवा व आळंदी नद्यांच्या पात्रातून आणि गोदावरी नदीवरील विभागाच्या अधिपत्याखालील एकूण १० कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या ठिकाणावरून प्रवाही व उपसा सिंचनाद्वारे हे पाणी दिले जाईल.

धरणांमधील उपलब्ध पाण्यातून प्रथम पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जाईल आणि उर्वरित पाण्यातून शेतीसाठी कालव्यांच्या आवर्तनानुसार पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा तसेच ठिबक व तुषार यांसारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतींचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहनही विभागाने केले आहे

0000

संबंधित पोस्ट

भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार दिल्लीतील महाराष्ट्र सदनात जंगी स्वागत

नमुंमपा जिल्हा स्तरीय शालेय जलतरण स्पर्धेला आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते उत्साहात प्रारंभ राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त नामांकित जलतरणपटू श्री शुभम वनमाळी यांची विशेष उपस्थिती..

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गतगावांच्या विकासासाठी लोकसहभाग वाढवावा- केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसेमलकापूर येथे तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न..

vishwatmaklokswamivarta

आज*राष्ट्रीय लोकअदालतीचे  आयोजन*

vishwatmaklokswamivarta

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे 11 दिवसांच्या बाळाचा मृत्यू!

vishwatmaklokswamivarta

उष्माघातापासून विद्यार्थ्यांच्या बचावासाठी शाळा-महाविद्यालय प्रमुखांना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या सूचना