vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सह्याद्री व्याघ्र राखीव वन क्षेत्रातील पर्यटन आराखड्यातील कामांना गती द्या – जिल्हाधिकारी संतोष पाटील

सह्याद्री व्याघ्र राखीव वन क्षेत्रातील पर्यटन आराखड्यातील कामांना गती द्या – जिल्हाधिकारी संतोष पाटील

 

सातारा प्रतिनिधी: सह्याद्री व्याघ्र राखीव वन क्षेत्रातील पर्यटन आराखड्यातील कामांना निधी उपलब्ध असूनही गेल्या दोन वर्षांपासून कामे रखडलेली आहेत. पर्यटनवाढीच्या दृष्टीने ही कामे शासनाने हाती घेतली आहेत, तरी या कामांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात सह्याद्री व्याघ्र राखीव वन क्षेत्रातील पर्यटन आराखड्यातील कामांचा जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी आढावा घेतला. या बैठकीला जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, कार्यकारी अभियंता राहूल अहिरे, एमटीडीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक हनुमंत हेडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी कुसवडे कारवट, कोयना रासाटी, पानेरी, निवळी, मेंढेघर येथील पर्यटन आराखड्यातील कामे व हेळवाक, येराड जलपर्यटन केंद्रांच्या कामाचा आढावा घेतला. या सर्व कामांना निधी उपलब्ध आहे, ठेकेदाराला सांगून पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्ते कामे पूर्ण करावी व पावसाळ्यात जी कामे करता येतील त्या कामाचे साहित्य आत्तापासून संबंधित ठिकाणी टाकावे. या कामांचे मंजुरीचे प्रस्ताव ज्या विभागाकडे प्रलंबित आहेत, अशा प्रस्तावांची यादी द्यावी संबंधित विभागाशी चर्चा करुन प्रस्तावांना तातडीने मंजुरी मिळवून देण्याचे कामही केले जाईल.

बामणोली येथील गोदाम नुतनीकरणाचे काम सुरु आहे. तेथील काही नागरिक या कामात अडथळा आणत आहेत, हे काम सुरळीत सुरु राहण्यासाठी व तातडीने पूर्ण होण्यासाठी जे कामात अडथळा आणतील त्यांच्यावर पोलीस विभागामार्फत कारवाई करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी बैठकीत केल्या.

0000

संबंधित पोस्ट

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेची व्याप्ती वाढवणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नमुंमपा निवडणूकीत प्रथमत:च बहुसदस्यीय पध्दतीने मतदान होत असल्याने विविध स्वरूपात जनजागृती…

vishwatmaklokswamivarta

राज्य युवा पुरस्कारासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘पत्रकार संवादिका’ पुस्तिका, घडीपत्रिकेचे प्रकाशन

स्वच्छ सर्वेक्षणामधील सुपर स्वच्छ शहराचे मानांकन टिकविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज !नागरिकांना स्वच्छताविषयक अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन!

राज्यामध्ये वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय,राज्यभरात ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारण्याचा प्रस्ताव-माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

vishwatmaklokswamivarta