vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सह्याद्री व्याघ्र राखीव वन क्षेत्रातील पर्यटन आराखड्यातील कामांना गती द्या – जिल्हाधिकारी संतोष पाटील

सह्याद्री व्याघ्र राखीव वन क्षेत्रातील पर्यटन आराखड्यातील कामांना गती द्या – जिल्हाधिकारी संतोष पाटील

 

सातारा प्रतिनिधी: सह्याद्री व्याघ्र राखीव वन क्षेत्रातील पर्यटन आराखड्यातील कामांना निधी उपलब्ध असूनही गेल्या दोन वर्षांपासून कामे रखडलेली आहेत. पर्यटनवाढीच्या दृष्टीने ही कामे शासनाने हाती घेतली आहेत, तरी या कामांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात सह्याद्री व्याघ्र राखीव वन क्षेत्रातील पर्यटन आराखड्यातील कामांचा जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी आढावा घेतला. या बैठकीला जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, कार्यकारी अभियंता राहूल अहिरे, एमटीडीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक हनुमंत हेडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी कुसवडे कारवट, कोयना रासाटी, पानेरी, निवळी, मेंढेघर येथील पर्यटन आराखड्यातील कामे व हेळवाक, येराड जलपर्यटन केंद्रांच्या कामाचा आढावा घेतला. या सर्व कामांना निधी उपलब्ध आहे, ठेकेदाराला सांगून पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्ते कामे पूर्ण करावी व पावसाळ्यात जी कामे करता येतील त्या कामाचे साहित्य आत्तापासून संबंधित ठिकाणी टाकावे. या कामांचे मंजुरीचे प्रस्ताव ज्या विभागाकडे प्रलंबित आहेत, अशा प्रस्तावांची यादी द्यावी संबंधित विभागाशी चर्चा करुन प्रस्तावांना तातडीने मंजुरी मिळवून देण्याचे कामही केले जाईल.

बामणोली येथील गोदाम नुतनीकरणाचे काम सुरु आहे. तेथील काही नागरिक या कामात अडथळा आणत आहेत, हे काम सुरळीत सुरु राहण्यासाठी व तातडीने पूर्ण होण्यासाठी जे कामात अडथळा आणतील त्यांच्यावर पोलीस विभागामार्फत कारवाई करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी बैठकीत केल्या.

0000

संबंधित पोस्ट

राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा अंबरनाथ, कबड्डी स्पर्धा नागपूर, कुस्ती स्पर्धा बीड तर खो-खो स्पर्धेचे बारामती येथे आयोजन-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय-महाराष्ट्राची क्रीडा परंपरा अधिक बळकट करण्यासाठी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

गिरणी कामगारांना मुंबईत घरे उपलब्ध करून देण्याबाबत‘एनटीसी’समवेत तातडीने बैठक घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश…

महानगरपालिकेच्या ‘एल’ विभागाकडून अनधिकृत दुकाने तसेच दुकानांची वाढीव बांधकामे आज निष्कासित…

vishwatmaklokswamivarta

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा : सहपालकमंत्री ॲड आशिष जयस्वाल**विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा*रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर*

✨🎬 गणेशोत्सव 2025 निमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची रील स्पर्धा 🎬✨

वंचित समाजाला शासकीय प्रमाणपत्रे देण्यासाठी व्यापक मोहीम राबविणार – मंत्री अतुल सावे