vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यातील सर्व कारागृहांमध्ये आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवसाचे आयोजन

राज्यातील सर्व कारागृहांमध्ये आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवसाचे आयोजन

मुंबई, प्रतिनिधी:- राज्यात मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत असलेल्या’ महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण’ या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व कारागृहांमध्ये बुधवारी 10 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवसाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग ‘ही राज्यातील मानवी हक्कांबाबत कायदेशीर कारवाई करणारी संस्था आहे.

10 डिसेंबर 1948 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने ‘मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा’ (यूडीएचआर) स्वीकारला होता. म्हणूनच 10 डिसेंबर हा दिवस मानवी हक्कांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी साजरा होतो. कैद्यांना त्यांच्या कारावासातील कालावधीत त्यांचे जीवन, समता, सन्मान आणि स्वातंत्र्याबद्दलचे कायदेशीर अधिकार कळावेत, याकरिता हा जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष मा. न्यायमूर्ती ए. एम. बदर यांच्या संकल्पनेतून, सदस्य मा. न्यायमूर्ती, स्वप्ना जोशी, संजय कुमार (भापोसे) यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील सर्व कारागृहांत ‘कैद्यांचे मानवी हक्क आणि संरक्षण’ या विषयी माहितीपुस्तिकेचे वाटप आणि मार्गदर्शन करून कायदेविषयक जागृती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे सचिव प्रदीपकुमार डांगे (भाप्रसे) आणि महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा या संस्थेचे अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक सुहास वारके (भापोसे) तसेच विजय केदार, निबंधक, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून होणाऱ्या या कार्यक्रमात राज्यातील सर्व प्रमुख जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, कारागृह प्रशासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत

संबंधित पोस्ट

CoffeewithCollector उपक्रमांतर्गत #जलतारा चळवळीत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व संस्थांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र महिलांच्या सन्मानार्थ काम करेल सर्वांनी मिळून संकल्प करुया-राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर

मागेल त्याला सौर कृषि पंप योजनेच्या निकषात बदल करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऊर्जा मंत्रालयाने निश्चित केलेल्या मानांकनामध्ये महावितरणने देशात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन..     

vishwatmaklokswamivarta

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे काटेकोरपणे नियोजन करा- जिल्हाधिकारी किशन जावळे*

जालना हे विचारांचे शहर, जालन्याच्या विकासासाठी भाजपलाच संधी द्या – रावसाहेब पाटील दानवे-भाजपचाच महापौर होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ – माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर भाजपला बहुमत दिल्यास जालन्याचा चेहरामोहरा बदलेल – कैलास गोरंट्याल एकजुटीने भाजपच्या पाठीशी उभे रहा – भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

कराड चिपळूण महामार्गाचे पाटण तालुक्यातील काम 15 डिसेंबर आधी पूर्ण करा*-पालकमंत्री शंभूराज देसाई*