vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भटक्या कुत्र्यांसाठी डॉग पॉन्ड, शेल्टर उभारण्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पावणेपाच कोटीचा निधी केला मंजूर– महानगरपालिका व 10 नगरपालिका /नगरपंचायत कार्यक्षेत्रात श्वान निवारा केंद्र उभारण्यात येणार

भटक्या कुत्र्यांसाठी डॉग पॉन्ड, शेल्टर उभारण्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पावणेपाच कोटीचा निधी केला मंजूर– महानगरपालिका व 10 नगरपालिका /नगरपंचायत कार्यक्षेत्रात श्वान निवारा केंद्र उभारण्यात येणार

        सांगली, प्रतिनिधी : मा. सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांच्या संदर्भात वेळोवेळी दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमिवर भटक्या श्वानांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकासह जिल्ह्यात 10 नगरपालिका व नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये श्वान निवारा केंद्र उभारणीसाठी 4 कोटी 74 लाख 86 हजार 620 रूपयांचा निधी पालकमंत्री चंदकांत पाटील यांनी मंजूर केला आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतून या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

       या उपक्रमांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणांसाठी निवारा, निर्बीजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक या उपाययोजना करण्यात येणार आहेत. यामध्ये महापालिका क्षेत्रासाठी 2 कोटी 51 लाख 86 हजार रूपये व जिल्ह्यातील एकूण 10 नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी 2 कोटी 23 लाख 6 हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचे डॉग शेल्न्टर उभे केले जाणार आहे. डॉग शेल्टरच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया एक महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हास्तरीय प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

या निवारा केंद्राच्या निर्माणामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या कमी होण्यास मदत होईल. केंद्राच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांना आश्रय मिळणार असून, त्यांची देखभाल आणि उपचार देखील केले जाणार आहेत.

00000

 

संबंधित पोस्ट

महाशिवरात्र यात्रा; वेरुळ मध्ये वाहनांना प्रतिबंध..

vishwatmaklokswamivarta

१५३ सायकलस्वार. एक राष्ट्र. सुनील शेट्टी आणि अमृता फडणवीस यांनी बाकर नासेरच्या ऐतिहासिक विश्वविक्रमी स्पिनला बळ 

जनगणना २०२७ साठी आज १ मे पासून होणार स्वयं-नोंदणी सुरू-नागरिकांनी सहभागी होण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

न्याय द्या, नाहीतर प्राण देईन! जयश्री कटके यांचे आमरण उपोषण तीव्र १२ दिवसांपासून अन्नत्याग; खंडणी, तोडफोड व जीवघेण्या धमक्यांचा आरोप – प्रशासन मात्र शांत

मुंबई सह उपनगरात आणि राज्यभरात रात्रभर मुसळधार पावसाची हजेरी

ऑपरेशन सिंदूर हे तिन्ही सेनादलांमधील समन्वय आणि कार्यान्वयन एकात्मकतेचे प्रतीक आहे: संरक्षण दल प्रमुख