vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते,महाराष्ट्र दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते,महाराष्ट्र दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण

        सांगलीसा1 प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापना दिवस समारंभ दि. 1 मे 2026 रोजी साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ शुक्रवार, दिनांक 1 मे 2026 रोजी सकाळी 8 वाजता पोलीस परेड ग्राऊंड, विश्रामबाग, सांगली येथे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

            मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी दि. 1 मे रोजी सकाळी 7.15 ते 9 वाजेपर्यंतच्या दरम्यान ध्वजवंदनाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजवंदन समारंभ आयोजित करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 7.15 च्या पूर्वी किंवा सकाळी 9 वाजल्यानंतर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व आई वडील यांनी उपस्थित रहावे. सुरक्षिततेच्या कारणास्तव कोणतीही पिशवी सोबत आणू नये. तसेच अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा, यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटव्दारे होणारे थेट प्रक्षेपण पहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

मिशन अयोध्या’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याची शोभा वाढविण्यासाठी प्रख्यात महंत परम पुज्य श्री रामगिरी महाराज विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमेरिकेचे महावाणिज्यदूत माईक हँकी यांनी घेतली सदिच्छा भेट दावोस गुंतवणूक करार, उद्योग संधीसाठी केले अभिनंदन…

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्यात ‘स्वच्छ सुंदर माझे कार्यालय’ उपक्रम साजरा

इतर मागास बहुजन कल्याण विभागात महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी

प्रोजेक्ट सक्षम उपक्रमाअंतर्गत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते गरजु महिलांना उद्योगपूरक उपक्रमांचे वाटप

vishwatmaklokswamivarta

निरपराध हिंदूंना गुंतवणार्‍या आणि अन्वेषण यंत्रणांचा भांडाफोड करणार्‍या ‘दाभोलकरहत्या आणि मी’ या झंझावाती पुस्तकाचे मुंबई येथे प्रकाशन,बांगलादेशी घुसखोरांना हाकलले नाही, तर महाराष्ट्रातील हे शेवटचे हिंदुत्वनिष्ठ सरकार ठरेल !- रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक